नायजेरियन व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सहाजण अटकेत

नालासोपारा : एका नायजेरियन नागरिकाचा खून करून बांगलादेश सीमेमार्गे भारतातून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा नायजेरियन आरोपींना २४ तासात पकडले. महाराष्ट्र व मेघालय पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. मेघालयातील शिलॉंग येथून वसईच्या वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सहाजणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सर्व आरोपींना शनिवारी शिलॉंगच्या स्थानिक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची ट्रान्झिट रिमांड घेऊन ते वसईला येत आहेत. मृत व्यक्ती हा नायजेरियन कम्युनिटीमध्ये एका पदावर होता. त्या मृत व्यक्तीने कम्युनिटीमध्ये काही आर्थिक अफरातफर केल्याचा आरोपींना संशय होता. या संशयातून त्याचा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


मृत व्यक्तीचे ३ मे रोजी नालासोपारा येथील राहत्या घरातून अपहरण केले होते. त्यानंतर ४ मे रोजी नायगावमध्ये एका फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह आढळला. यावेळी या फ्लॅटमध्ये राहणारे तीन नायजेरियन घर सोडून गेल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना मयताच्या घराजवळचा सीसीटीव्ही हाती लागला. या सीसीटीव्हीमध्ये सहा नायजेरियन मृत व्यक्तीला जबरदस्तीने घरातून बाहेर काढत मारहाण करीत चारचाकी गाडीतून घेऊन जात असल्याचे दिसले.


दरम्यान, आरोपी देश सोडून जाऊ नये म्हणून तात्काळ लुक आऊट नोटीस जारी केली. आरोपी गुवाहाटी-चेरापुंजी-शिलाँग-डावकीमार्गे बांगलादेश येथे पळून जाण्याच्या मार्गावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मेघालय पोलिसांनी सहा आरोपींना ६ मे रोजी ताब्यात घेतले. महाराष्ट्र पोलीस आणि मेघालय पोलिसांनी केलेल्या संयुक्तिक कारवाईमुळे सहाही जणांना २४ तासांच्या आत अटक केली.

Comments
Add Comment

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना

महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता

उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजार विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना