गृहमंत्री अमित शहांनी खादी उत्पादनांच्या विक्रीचा केला प्रारंभ

नवी दिल्ली (पतिनिधी) : केंद्र सरकारच्या "स्वदेशी" मोहिमेचा संपूर्ण देशात विस्तार करण्यासाठी निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये हस्तनिर्मित खादी उत्पादनांची विक्री सुरू करण्यात आली आहे. गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या १०७ कॅन्टीनमध्ये खादी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ झाला. देशातील निमलष्करी दलांची सर्व कॅन्टीन्स लवकरच खादी उत्पादनांची विक्री सुरू करतील, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.


“गांधीजींसाठी खादी हे स्वदेशीचे प्रतीक होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचेही ते एक साधन आहे. खादी शुद्धतेची हमी आहे. १०७ निमलष्करी कॅन्टीनमध्ये खादी उत्पादनांची विक्री सुरू झाल्याचा मला आनंद झाला आहे आणि लवकरच देशभरातील सर्व निमलष्करी कॅन्टीनमध्ये खादी उत्पादने उपलब्ध करून दिली जातील,'' असे गृहमंत्र्यांनी आसाममधील तामुलपूर येथे बीएसएफच्या केंद्रीय कर्मशाळा आणि भांडाराच्या पायाभरणी कार्यक्रमादरम्यान सांगितले.


यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, गृह सचिव अजय कुमार भल्ला आणि सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक उपस्थित होते. तत्पूर्वी, स्वदेशीला चालना देण्यासाठी, गृहमंत्र्यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगामार्फत सर्व कॅन्टीनसाठी अधिकाधिक "स्वदेशी" उत्पादने विकणे अनिवार्य केले.

Comments
Add Comment

विमानतळावरचे महागडे पदार्थ खरेदी करायचे नसतील तर ट्राय करा ही आयडिया

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागडे पदार्थ खरेदी करण्याआधी

धक्कादायक! वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, वंशद्वेषातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय

लंडन: ब्रिटनच्या वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय वंशाच्या २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक

भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्यानंतरचे

नोव्हेंबरपासून देशात सुरू होणार नवे नियम, जाणून घ्या सविस्तर!

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिना काहीच दिवसात संपणार असून येणाऱ्या नवीन महिन्यापासून देशभरात आधारकार्डपासून

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि