केरळमध्ये पाच वर्षांखालील मुलांना टोमॅटो फ्लूचा संसर्ग

कोल्लम : केरळ राज्यात 'टोमॅटो फ्लू' नावाच्या दुर्मिळ विषाणूजन्य आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराचा ८० पेक्षा जास्त मुलांना संसर्ग झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे सर्व प्रकरणे पाच वर्षांखालील मुलांची आहेत आणि त्यांची नोंद स्थानिक सरकारी रुग्णालयांतून झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमध्ये आधीच 'टोमॅटो फ्लू' किंवा 'टोमॅटो फिव्हर'ची ८२ घटनांची नोंद झाली आणि ही संख्या वाढण्याचा अंदाज आहे.


टोमॅटो फ्लू हा भारतातील एक सामान्य प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग आहे. ज्यामध्ये पाच वर्षाखालील कमी वयाच्या मुलांना ताप येतो, सहसा पुरळ उठणे, त्वचेची जळजळ होते. या फ्लूमुळे संक्रमित मुलांच्या शरीराच्या अनेक भागांवर फोड येतात, ज्याचा रंग सामान्यतः लाल असतो. म्हणून याला “टोमॅटो फ्लू” किंवा “टोमॅटो फीवर” म्हणतात. सध्या, संसर्ग फक्त केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील काही भागांमध्ये नोंदवला आहे. परंतु आरोग्य अधिकार्‍यांनी ईशारा दिला आहे की प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास, संसर्ग इतर भागातही पसरू शकतो.


या संदर्भात वैद्यकीय पथकाकडुन टोमॅटो फ्लूची लक्षणे तपासली जात आहेत. तसेच, अंगणवाड्यांमधील पाच वर्षांखालील मुलांची तपासणी करण्यासाठी २४ सदस्यांची टीम तयार करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

शैक्षणिक संस्था, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि क्रीडा संकुलात भटक्या कुत्र्यांना ‘नो एण्ट्री’

सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश नवी दिल्ली : शैक्षणिक संस्था, बस-रेल्वे

तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीचे 'एटीसी' कोलमडले! दिल्लीच्या एटीसी बिघाडाचा फटका मुंबईला!

नवी दिल्ली: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणी एअर ट्रॅफिक

PM Modi : बिहारला नको 'कट्टा सरकार'! पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर 'दुतोंडी, गुंड' म्हणत जोरदार हल्लाबोल

औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी औरंगाबाद येथील एका

Delhi Airport : ATC सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड; दिल्ली विमानतळावर उड्डाणांना विलंब; प्रवाशांना मनस्ताप

नवी दिल्ली : देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) गुरुवारी

४१६ वर्षांत ४१६ वेळाच उघडले कार्तिकेयाचे मंदिर

ग्वालियर : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर, राज्यातील एकमेव भगवान कार्तिकेय स्वामी मंदिराचे दरवाजे अखेर मंगळवारी

राजस्थानमध्ये लग्नसराईत २५ हजार कोटींची उलाढाल!

जीएसटी कौन्सिलने वस्तूंवरील कर कमी केल्याचा थेट परिणाम जयपूर : लग्न म्हटलं की संगीताचे सुस्वर, सजवलेला मंडप,