‘असानी चक्रीवादळाचा मुंबईवर परिणाम नाही’

मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम बंगालच्या उपसागरात ‘असानी' चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हे चक्रीवादळ पश्चिम, मध्य आणि लगतच्या दक्षिण बंगालच्या उपसागरात निर्माण झाले असून पश्चिम वायव्य दिशेने ते सरकले आहे. मात्र या चक्रीवादळचा मुंबईवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


तर पुढे हे चक्रीवादळ उत्तर-ईशान्य दिशेला वळून ओडिशाच्या किनाऱ्यापासून वायव्य बंगालच्या उपसागराकडे जाण्याची दाट शक्यता आहे. पुढील ४८ तासांत ते हळूहळू कमकुवत होऊन वादळात बदलण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे चक्रीवादळ हे मुंबई समुद्र किनाऱ्यापासून बरेच दूर आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता ही कमी असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.


दरम्यान, गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतील कमाल तापमान स्थिर आहे. सोमवारी कुलाबा ३३.५, सांताक्रूझ ३५.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील पाच दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. सध्या हवेचा वेग मंदावला असून समुद्राकडून वाहणारे वारे उष्ण आहेत. त्यामुळे हवेत आर्द्रता जाणवत आहे असे ही नायर पुढे म्हणाल्या आहेत.

Comments
Add Comment

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त