कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात; तिघे गंभीर

  108

नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव-औरंगाबाद रोडवर ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. यात ट्रक पलटी झाल्याने झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत, तर २४हून अधिक कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. डॉक्टरवाडी शिवारात काल रात्री ही घटना घडली. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिमाशंकर येथून ट्रक क्र. एम. एच. १४ सि. यू. २०५ हा कारखान्यावरून ऊस तोडणी मजुरांना चाळीसगाव तालुक्यातील बोढरे तांडा येथील घरी पोहोचवण्यासाठी निघालेला असताना नांदगाव-औरंगाबाद रस्त्यावरील डॉक्टरवाडी शिवारात चालक प्रदीप प्रकाश चव्हाण याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात अनिल चव्हाण, विश्वानाथ गिते व विलास वाघ हे गंभीर जखमी झाले असून त्यांना धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नांदगाव ग्रामीण रुग्णालयात रेणुका तांबे, प्रवीण पवार, ललीत चव्हाण, प्रकाश चव्हाण, सावली चव्हाण, सरला चव्हाण, पुनम चव्हाण, शैली चव्हाण, जयश्री चव्हाण, योगेश चव्हाण, राजाराम चव्हाण, चंद्रकला चव्हाण, सुवर्णा चव्हाण, बैनशी चव्हाण, काजल चव्हाण, भाग्यश्री चव्हाण, गोकुळ चव्हाण, लता चव्हाण, सौरभ चव्हाण, तुळशीराम चव्हाण, अमेदी चव्हाण सर्व रा. (बोढरे ता. चाळीसगाव) हे ऊसतोड कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका तसेच पोलिसांच्या वाहनातून जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.


जखमींवर तातडीने नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे, मालेगाव, चाळीसगाव येथे पाठवण्यात आले. जखमींची संख्या जास्त असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांसह परिसरातील खासगी डॉक्टरांनीदेखील यावेळी अपघातातील जखमींवर उपचार करत मदतीसाठी धावून आले. याप्रकरणी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भूषण अहिरे अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या

मोठी बातमी! सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० पोलिसांना अन्नातून विषबाधा

सोलापूर: सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली.