डहाणूच्या समुद्रात १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

बोईसर (वार्ताहर) : डहाणूजवळील नरपड येथील समुद्रात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या ओम किशोर म्हात्रे (वय १३) या मुलाचा बुडून मृत्यू झाला. डहाणू पोलिसांनी तटरक्षक दलाच्या मदतीने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधमोहीम राबवून त्याचा मृतदेह शोधण्यात यश मिळवले.


ओम हा डहाणूच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होता. उन्हाळी सुट्टी असल्यामुळे ओम शुक्रवारी दुपारी चार मित्रांसह जवळील समुद्रात पोहण्यासाठी गेला होता. बराच वेळ होऊनही ओम घरी न परतल्याने त्याचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केल्यावर ओम हा समुद्रात बुडाला आहे असे त्याच्यासोबत असलेल्या घाबरलेल्या मित्रांनी रात्री उशिरा सांगितले.


ओमला शोधण्याची मोहीम दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी डहाणू पोलीस स्टेशनचे निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, जीवरक्षक, स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांच्या मदतीने सुरू केली. मात्र समुद्राला ओहोटी असल्याने शोधमोहिमेत अडथळे येत होते. दुपारी पुन्हा भरती सुरू झाल्यावर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोध सुरू केला असता संध्याकाळच्या सुमारास डहाणू आगर किनाऱ्याजवळ ओमचा मृतदेह सापडला.

Comments
Add Comment

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता