‘एनएमएमटी’मधील स्टॉपची बटण सिस्टीम अखेर ‘स्टॉप’

नवी मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक शहराला सजेशा बसेसमध्ये बसेसची बांधणी करणाऱ्या कंपनीने स्टॉपची बटणे निर्माण केली. यामागे प्रचलित घंटीचा वापर करू नये. या प्रकरचा संकेत दिला गेला होता; परंतु बसेसमध्ये बसविण्यात आलेल्या बटणावर प्रवाशी विद्यार्थी व लहानग्यांनी त्याचा वापर मजेसाठी केल्यामुळे चालकाची डोकेदुखी वाढली. म्हणून यावर प्रतिबंध यावा म्हणून कार्यान्वित केलेली बटन सिस्टीम बंद करण्याची वेळ मनपा परिवहन उपक्रमावर आली आहे.


मनपाच्या परिवहन उपक्रमात पाचशेपेक्षा जास्त विविध प्रकारच्या बसेस आहेत; परंतु यातील नव्याने आलेल्या पर्यावरणपूरक वातानुकूलित बसेस व काही साध्या बसेसमध्ये घंटी विरहित बस सेवा मिळावी. म्हणून बसेसमध्ये असणाऱ्या लोखंडी रॉडवर स्टॉप नावाचे बटन लावून त्याद्वारे बसेसचे मार्गक्रमण चालावे हा उद्देश होता. पण त्याचा दुरुपयोग सुरू झाल्याने उपक्रमाला आधुनिक स्टॉप सिस्टीम बंद करण्याची परिस्थिती ओढवली आहे.


बस सेवा सुरू झाल्यावर यापूर्वी सुतळीचा वापर करून घंटी त्याला बांधली जात होती. त्याद्वारे एक घंटी वाजली की बस थांबविली जात असे. तर दोन घंटी वाजल्यावर बस पळवण्याचे संकेत होते. यामुळे वाहकाला सुतळीपर्यंत जावे लागत होते; परंतु नव्याने यंत्रणा वापरून स्टॉपचे बटन आगदी कंबरेच्या उंचीवर होते. तसेच बसेसमधील सर्वच प्रवाशांना आधारासाठी उभारलेल्या रॉड वर असल्याने वाहक सहज थांबा आल्यावर स्टॉपचे बटन दाबून बस थांबवून बस थांबवण्याचा इशारा चालकाला करत असे; परंतु विद्यार्थ्यांच्या मस्तीमुळे स्टॉपच्या बटणावर पाणी फेरले गेले आहे.


बसेसमध्ये स्टॉपचे बटन हाताशी असल्याने लहानग्यांना मजा येत असे. बटन दाबल्यावर टुकटुक आवाजाने विद्यार्थी आनंदित होत बटन दाबण्याचा सिलसिला नेहमीच चालला होता. त्यामुळे मनस्ताप होत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.


स्टॉपचे बटन का बंद केले आहे, याची माहिती घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल. - अनिल शिंदे, वाहतूक अधीक्षक, परिवहन उपक्रम.

Comments
Add Comment

Mumbai HC Voting List : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; मतदार यादी विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या!

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self-Government Bodies) निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने

मुंबई विमानतळावर २० नोव्हेंबरला दोन्ही रनवे तात्पुरते बंद

मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज

...म्हणून रोहित आर्यशी बोलले नव्हते माजी मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मागील आठवड्यात पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांच्या घटनेनंतर सर्वत्रच भीतीदायक वातावरण

मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी केला छळ! दोन अधिकारी निलंबित

मुंबई: मुंबईहून मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी छळ केल्याची घटना समोर येत आहे. संबंधित

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना मुंबई  : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६

भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ च्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांचे क्रमांक जाहीर करण्यात