सोमय्या सहकुटुंब पोलीस ठाण्यात दाखल, राऊतांविरोधात तक्रार

मुंबई : किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी चारित्र्यहनन केल्याप्रकरणी संजय राऊतांच्या विरोधात मुलूंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलूंड पोलीस ठाण्यात सोमय्या कुटुंबीयांसह दाखल झाले होते. आयपीसी ५०३, ५०६ आणि ५०९ अंतर्गत पोलिसांनी एफआयआर दाखल करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. मिरा-भाईंदरमध्ये शौचालय घोटाळ्यात राऊत यांनी मेधा सोमय्यांवर आरोप केले होते.


सोमय्या कुटुंबीयांनी १०० कोटींचा घोटाळा करत सर्वसामान्यांचा पैसा लाटल्याचे त्यांनी म्हटले होते. याप्रकरणात माफी मागण्यासाठी सोमय्यांनी अल्टिमेटम दिला होता. मात्र राऊतांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने सोमय्यानी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.


मिरा-भाईंदर शहरात एकूण १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना मिळाले. त्यांचे युवक प्रतिष्ठान आहे. यामार्फत हे कंत्राट मार्गी लावण्यात आले. मात्र, बनावट कागदपत्रे सादर करून, पालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.


साडे तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.

Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,