आंब्याचे दर घसरले...

अतुल जाधव


ठाणे : सध्या नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंबे घेण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांची गर्दी होत आहे. एक हजार, आठशे रुपये डझन मिळणारा हापूस आंबा दोनशे, चारशे रुपये डझन भावाने मिळत असल्याने आंबा खरेदी करण्यासाठी झुंबड उडत आहे. मात्र आंब्याच्या दरात असलेली घसरण पाहून आंबा उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ग्राहकांच्या बजेटमध्ये आंबा मिळत असल्याने ग्राहक राजा मात्र सुखावला आहे.


कोकणातील हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र आवक कमी असल्याने आंब्याचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. एपीएमसी मार्केटमध्ये ९० हजारपेक्षा जास्त हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाल्याने भाव कोसळले आहेत. जवळपास एक हजार रुपये डझन मिळणारा आंबा आता २०० ते ५०० रुपयांवर आला आहे.


नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात आवक वाढू लागली आहे. दिवसाला जवळपास ९० हजार पेट्यांची आवक होऊ लागल्याने हापूस आंब्यांचे दर निम्म्यावर आले आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा येऊ लागला आहे. अवकाळी पावसामुळे मार्च, एप्रिलमध्ये येणाऱ्या आंब्यावर परिणाम झाल्याने आवक घटली होती. त्यामुळे डझनाला हापूस आंब्याचे भाव एक हजारांच्या वर गेले होते. मात्र आता तेच भाव २०० ते ५०० रुपये डझनावर आले आहेत. हापूस आंब्याबरोबर पायरी, केसर, बदामी, लालबाग, मलिका या आंब्यांचीही कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून आवक झाली आहे.


एपीएमसी मार्केटमध्ये आंबा स्वस्त झाल्याने किरकोळ व्यापाऱ्यांबरोबर सर्वसामान्य ग्राहकांनीही गर्दी केली आहे. हापूस आंब्याबरोबर इतर जातींच्या आंब्यांचे दरही निम्म्यावर आले आहेत. त्यातच हापूस आंब्याचा सीझन पुढील १५ दिवसच चालणार असल्याने खवय्यांची पावले नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटकडे वळत आहेत.

Comments
Add Comment

ठाण्यात वाघीण मैदानात! चित्रा वाघ ॲक्शन मोडवर; वाघ यांच्या एन्ट्रीने अनेकांची धाकधूक वाढली!

कळवा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज

नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त ठाणे  : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा

सुजाता मडके या शहापूरच्या कन्येची ‘इस्रो’मध्ये थरारक झेप

ठाणे : ‘यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते,’ या शब्दात

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

‘आपला दवाखान्या’चा वापर अन्य ‘उद्योगां’साठी

पगार थकला; आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी ठाणे  : ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला 'आपला दवाखाना' हा