राज्यातील नेत्यांनीच थकवले करोडोंचे वीज बिल

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भारनियमनाचे संकट ओढावले आहे. राज्यातील जनतेने आपले थकीत वीज बिल लवकरात लवकर भरावे असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून करण्यात येत असतानाच, आता राज्यातील आमदार, खासदारांनीच करोडो रुपयांचे वीज बिल थकवल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये महाविकास आघाडीमधील कॅबिनेट मंत्र्यांचा देखील समावेश असल्याची धक्कादायक माहिती ऊर्जा विभागाच्या नव्या यादीतून समोर येत आहे.


राज्यातील एकूण ३७२ राजकीय व्यक्तींकडे तब्बल १ कोटी २७ लाखांच्या वीज बिलांची थकबाकी असल्याचे समजत आहे. यामध्ये राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांबरोबरच भाजपचे केंद्रीय मंत्री आणि खासदारांचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सर्वाधिक म्हणजेच तब्बल ४ लाख रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी आहे. तर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे ७० हजार रुपयांचे वीज बिल थकीत आहे. ऊर्जा विभागाने थकीत वीज बिलांबाबत जाहीर केलेल्या या नव्या यादीतून ही माहिती मिळत आहे.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाले यांनी २ लाख ६३ हजार रुपयांचे वीज बिल थकवले आहे. त्याचबरोबर भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे १ लाख २५ हजारांची थकबाकी आहे. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचे १ लाख, शिवसेना आमदार संदिपान भुमरे यांचे १ लाख ५० हजार, भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे ७ लाख, भाजप खासदार रणजित निंबाळकर यांचे ३ लाख रुपयांचे वीज बिल थकीत असल्याचे समजते.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,