राज्यातील नेत्यांनीच थकवले करोडोंचे वीज बिल

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भारनियमनाचे संकट ओढावले आहे. राज्यातील जनतेने आपले थकीत वीज बिल लवकरात लवकर भरावे असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून करण्यात येत असतानाच, आता राज्यातील आमदार, खासदारांनीच करोडो रुपयांचे वीज बिल थकवल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये महाविकास आघाडीमधील कॅबिनेट मंत्र्यांचा देखील समावेश असल्याची धक्कादायक माहिती ऊर्जा विभागाच्या नव्या यादीतून समोर येत आहे.


राज्यातील एकूण ३७२ राजकीय व्यक्तींकडे तब्बल १ कोटी २७ लाखांच्या वीज बिलांची थकबाकी असल्याचे समजत आहे. यामध्ये राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांबरोबरच भाजपचे केंद्रीय मंत्री आणि खासदारांचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सर्वाधिक म्हणजेच तब्बल ४ लाख रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी आहे. तर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे ७० हजार रुपयांचे वीज बिल थकीत आहे. ऊर्जा विभागाने थकीत वीज बिलांबाबत जाहीर केलेल्या या नव्या यादीतून ही माहिती मिळत आहे.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाले यांनी २ लाख ६३ हजार रुपयांचे वीज बिल थकवले आहे. त्याचबरोबर भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे १ लाख २५ हजारांची थकबाकी आहे. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचे १ लाख, शिवसेना आमदार संदिपान भुमरे यांचे १ लाख ५० हजार, भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे ७ लाख, भाजप खासदार रणजित निंबाळकर यांचे ३ लाख रुपयांचे वीज बिल थकीत असल्याचे समजते.

Comments
Add Comment

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय

लातूरकरांचा प्रवास सुसाट! राज्य सरकारची मुंबई-लातूर महामार्गाला संमती, संरेखनेचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते लातूर

आचारसंहितेमुळे रखडलेली सोडत लवकरच होणार; पुणे मंडळाच्या सभापतींनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर,

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची