महापालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्य : उच्च न्यायालय

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिका वगळता अन्य सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांत बहुसदस्यीय प्रभाग रचना पुन्हा आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्यच आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे आता मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग असतील.

कानिटकर आणि भातकर यांनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. त्यावेळी उच्च न्यायालयाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धत योग्य असल्याचे सांगत संबंधित याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे आता मुंबई वगळता इतर सर्व महानगरपालिका निवडणुकीत ३ सदस्यीय प्रभाग पद्धत आणि मुंबईत एकच वॉर्ड असेल. नगरपालिका आणि नगर परिषदेत मात्र दोन सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीमध्येही एक सदस्यीय पद्धत असेल. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावरील याचिकेवर निकाल देताना राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा दोन आठवड्यांच्या आतमध्ये जाहीर करण्याचे निर्देश दिले होते.

यावेळी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोघेही ओबीसी आरक्षणासाठी आग्रही आहेत. त्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात कायदाही मंजूर करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. मात्र प्रभाग रचनेसह निवडणुकीची इतर तयारी करण्यासाठी आणखी एक-दीड महिना लागेल. त्यानंतर पावसाळा आहे. त्यामुळे या काळात निवडणुका होऊ शकणार नाहीत. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी साधारण सप्टेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे.

Recent Posts

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – जे.पी.नड्डा

छत्रपती संभाजीनगर : जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली…

28 minutes ago

DC vs RCB, IPL 2025: दिल्लीचे आरसीबीला जिंकण्यासाठी १६३ धावांचे आव्हान

दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात घरच्या मैदानावर दिल्लीने आरसीबीला विजयासाठी धावांचे आव्हान दिले आहे.…

1 hour ago

कोकण रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांकडून २३ कोटीचा दंड वसूल

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वे प्रशासनाने मोठी मोहीम चालवली…

2 hours ago

जास्तीत जास्त ४८ तासांत कापणी करुन शेत साफ करा, शेतकऱ्यांना BSF चा आदेश

नवी दिल्ली : पहलगाम अतिरेकी हल्ला झाल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. या…

3 hours ago

पहलगाममध्ये अतिरेक्यांना स्थानिकांनी केली मदत

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. नाव आणि धर्म…

3 hours ago

दुचाकीला धडकून विहिरीत पडली व्हॅन, सहा जणांचा मृत्यू

मंदसौर : भरधाव वेगाने जात असताना अनियंत्रित झालेली इको व्हॅन दुचाकीला धडकून विहिरीत पडली. या…

5 hours ago