IPL 2025 : आयपीएलच्या सुरक्षेत वाढ; जाणून घ्या कारण

मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. अशातच आता भारतात सुरू असलेल्या आयपीएल २०२५ टुर्नामेंटची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सध्या आयपीएलचा १८ वा हंगाम सुरू आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून प्रेक्षक आणि खेळाडूंच्या सुरक्षेसाठी स्वदेशी अँटी ड्रोन सिस्टिम कार्यान्वीत करण्यात आली आहे.


बिग बँग सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडने (बीबीबीएस) शनिवारी (दि.२६) देशभरात जिथे इंडियन प्रीमियर लिगचे सामने खेळण्यात येत आहे, तिथे स्वदेशी अँटी ड्रोन सिस्टिम कार्यान्वीत केली आहे.त्याचसोबत वज्र सुपर शॉट सुद्धा तैनात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. वज्र सुपर शॉट हे एक हलके, हातात धरण्याजोगे अँटी ड्रोन शस्त्र आहे. ते ४ किलोमीटर दूरपर्यंतच्या ड्रोनचा लागलीच शोध घेते आणि शत्रूच्या ड्रोन कम्युनिकेशन सिग्नल तोडते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नसतो.



बीबीबीएसने जारी केलेल्या पत्रकानुसार, ही प्रणाली पोर्टेबिलिटी आणि अनुकूल फ्रिक्वेन्सी जॅमिंगसह समोरच्या शस्त्राला प्रभावित करते. राष्ट्रीय सुरक्षा आणि स्वदेशी रक्षा प्रणाली विकसीत करण्यासाठी बीबीबीएस नेहमी तत्पर असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जर स्टेडियमच्या जवळपास एखादे फ्लाईंग ऑब्जेक्ट, ड्रोन वा इतर एखादी यंत्रणा आकाशात दिसली तर हे अँटी ड्रोन सिस्टिम त्याचे कम्युनिकेशन सिग्नल डॅमेज करते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेला बाधा येत नाही.


या सिस्टिमचा आयपीएल २०२५ मधील ४३ व्या, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद या दोन संघाच्या सामन्या दरम्यान पहिल्यांदा करण्यात आला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येक सामन्यात ही यंत्रणा लागू करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे स्टेडियमवर खुल्या आकाशातून सुरक्षा यंत्रणेला धोका होऊ नये याची काळजी घेतली जाते. त्यासाठी स्वदेशी अँटी ड्रोन सिस्टिमचा वापर करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना