राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची निवड

  96

मुंबई (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड केल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केली. सध्या राज्यातील जिल्हा कमिट्या तशाच राहणार आहेत मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्ष पद पहिल्यांदाच देण्याचा निर्णय झाल्याचे फौजिया खान यांनी सांगितले.


यावेळी नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.यावेळी फौजिया खान यांनी विद्याताई चव्हाण यांना नियुक्तीपत्र दिले.


विद्या चव्हाण यांनी ही नियुक्ती स्विकारत असल्याचे सांगतानाच महागाईसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाला आहे. महिला वर्ग त्रासाला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन असे सांगतानाच माध्यमाकडून सहकार्य मिळावे अशी, अपेक्षाही चव्हाण यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

Ahmedabad plane crash: टाटा सन्स मृतकांच्या वारसांना देणार १ कोटींची मदत

अपघातात क्षतीग्रस्त झालेले रुग्णालय देखील उभारणार टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची घोषणा मुंबई :

अल्पसंख्याक महाविद्यालयांवरील सामाजिक आरक्षणाला उच्च न्यायालयाची तूर्त स्थगिती

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या सामाजिक

व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी नागालँडहून तिघे अटकेत; दीड कोटींच्या खंडणीमागणीचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा

सुरक्षिततेसाठी असणारे बेरिकेट्स ठरताहेत धोकादायक

वाहन चालकांसह प्रवाशांना डोकेदुखी कांदिवली  : कांदिवली विभागात मुख्य मार्गांवर, रस्त्यावर, नाक्यावर तसेच

मेट्रो ३ चा दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतरही प्रवाशांची प्रतीक्षाच

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा 'टप्पा २ अ' वाहतूक

‘तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निणर्य घेणार'

मुंबई : तृतीयपंथीयांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्यासाठी तृतीयपंथीय हक्कांचे