आयआयटी मुंबईच्या अॅपवर हवामानाचे अंदाज

मुंबई (प्रतिनिधी) : शेतकरी किंवा मासेमारी करणाऱ्या नागरिकांसाठी हवामानाची अचूक माहिती असणे खूप गरजेचे असते, या हवामानाच्या अंदाजामुळे त्यांना पुढील निर्णय घेण्यास सोपे जातात. त्यामुळे नागरिकांना हवामानाची माहिती मिळावी म्हणून आयआयटी मुंबई एक ऍप उपलब्ध करुन देणार आहे.


या नवीन उपक्रमासाठी आयआयटी मुंबईने भू विज्ञान मंत्रालयाशीही सहकार्य करार केला असून, याद्वारेही हवामान बदलासंदर्भात संशोधन केले जाणार आहे. या नविन उपक्रमामुळे नागरिकांना त्वरित त्यांच्या मोबाईलवर हवामानाची स्थिती समजनार आहे.


देशाला सन २०७०पर्यंत 'शून्य उत्सर्जना'चे उद्दिष्ट्य साध्य करायचे आहे. या प्रवासात आयआयटी मुंबई तंत्रज्ञानावर आधारित सुविधा घेऊन सहभागी होणार आहे. यासाठी दहा वर्षांपूर्वी आयआयटीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या 'सेंटर फॉर एक्सलन्स इन क्लायमेट सर्व्हिसेस'च्या माध्यमातून विशेष पावले उचलली जाणार आहेत.


संबंधित अॅपचा फायदा देशातील शहरी तसेच ग्रामीण भागांतील विविध वापरकर्त्यांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर या सहकार्यामधून सेन्सॉर्स, ड्रोन आधारीत स्मार्ट मॉनिटरिंग प्रणाली, स्मार्ट अॅग्रीकल्चर तंत्रज्ञान, स्वयंचलित पूर्वसूचना प्रणाली, आरोग्य आणि हवामान, स्मार्ट पॉवरग्रिड व्यवस्थापन, उष्णतेच्या लाटेचा अंदाज अशा विविध बाबींवर संशोधन होणार आहे.

Comments
Add Comment

किसान क्रेडिट कार्डधारकांना राज्य शासनाकडून चार टक्के व्याज सवलत

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यास यश मुंबई  : महाराष्ट्रातील मच्छीमार व मत्स्यव्यवसायाशी

विमान तिकीट रद्द केल्यास २१ दिवसात पैसे परत मिळणार

मुंबई : महागडी विमान तिकिटे काढून ऐनवेळी ती रद्द करण्याची वेळ आली तर त्यावर बसणार भुर्दंड आणि पैसे परत

कुपर रुग्णालयातील अस्वच्छतेच्या मुद्दयानंतर महापालिका आरोग्य विभागाला जाग, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वच्छता पंधरवडा

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील स्वच्छता ही आता चिंतेचा विषय ठरला आहे. कुपर

महापालिका मुख्यालय परिसरात वाहनतळाची असुविधा,महापालिका अस्तिवात आल्यानंतर नगरसेवकांची वाहने उभी राहणार कुठे?

मुंबई (सचिन धानजी): मुंबईकरांना वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेला आपल्याच कर्मचाऱ्यांना वाहने

...तर मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मागील चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील