मुंबई : राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) मनसुख हिरेन हत्येप्रकरणी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुखच्या हत्येत मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे.
या हत्येचा कथित कट हा मुंबई पोलीस आयुक्तांच्या इमारतीत रचला होता. जिथे प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी अनेक बैठकांना उपस्थित होते, असे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
मनसुखची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचेही नमूद केले आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १७ जुलै रोजी ठेवली आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ही स्कॉर्पिओ हिरेन यांच्या नावावर होती. या घटनेनंतर ५ मार्चला मुंब्रा इथल्या रेतीबंदर भागात मनसुखचा मृतदेह सापडला होता. मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली, असून आणखी ८ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…