Categories: पालघर

कृषीभूषण पुरस्कारावर शेतक-यांची नाराजी

Share

वाडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील गालतरे येथील गोवर्धन इको व्हिलेजचे प्रमुख सनतकुमार प्रभुजी यांना यंदाचा राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार काल नाशिक येथे झालेल्या एका समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते व राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. मात्र या पुरस्कारावर अनेक शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली असून निषेध नोंदवला आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने दरवर्षी कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या शेतक-यांना कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावर्षीचा कृषीभूषण पुरस्कार वाडा तालुक्यातील गालतरे येथील गोवर्धन इको व्हिलेजचे प्रमुख सनतकुमार प्रभुजी यांना देण्यात आल्याने अनेक शेतक-यांनी यावर नाराजी व्यक्त केली.

कृषीभूषण या पुरस्काराचा खरा हक्कदार सर्वसामान्य शेतकरीच असायला हवा. धर्मदाय संस्थेला कृषीभूषण पुरस्कार देणे संयुक्तिक वाटत नाही. तुटपुंज्या साधनांसह व कमी गुंतवणुकीत शेतीमध्ये काबाडकष्ट करून वेगवेगळे प्रयोग करणारा शेतकरीच खरा कृषीभूषण असू शकतो, अशा प्रतिक्रिया शेतक-यांमधून उमटू लागल्या आहेत.

अलीकडेच राजेंद्र पवार यांनी कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते स्विकारण्यास नकार दिला होता. त्यातच आता दुसरा महत्वाचा पुरस्कार एका संस्थेला दिल्याने शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील शेतक-याला कृषिमंत्र्यांनी शेतीवर संशोधन करणा-या, शेतीत नवनवीन प्रयोग करणा-या शेतक-याला पुरस्कार द्यायला हवा होता. मात्र एखादा संस्थेला हा पुरस्कार दिल्याने तो आम्हाला मान्य नसून आम्ही त्याचा निषेध करतो. -बी.बी.ठाकरे ओबीसी नेते.

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणा-या एखाद्या प्रगतशील शेतक-याला सदरचा पुरस्कार दिला पाहिजे होता. असा पुरस्कार दिल्याने त्याला काही अर्थ राहिला नाही. -प्रफुल्ल पाटील, युवा शेतकरी.

Recent Posts

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

12 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

36 minutes ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

41 minutes ago

RCB vs RR, IPL 2025: घरच्या मैदानावर आरसीबीचा पहिल्यांदा विजय, राजस्थानवर ११ धावांनी केली मात

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…

1 hour ago

वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ

नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…

2 hours ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांची चूक; सर्वपक्षीय बैठकीत केंद्राची कबुली

नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…

2 hours ago