कोरोना संपलेला नाही; दक्ष रहा- राष्ट्रपती

नवी दिल्ली (हिं.स.) : कोरोना रोग पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी केले. दिल्लीच्या रोहिणी परिसरातील भगवान महावीर सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.


याप्रसंगी राष्ट्रपती म्हणाले की, सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की कोविड अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. मी सर्व देशवासियांना आवाहन करतो की त्यांनी पूर्णपणे सतर्क राहावे आणि सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. जैन धर्माच्या प्रवर्तकांना मास्कची उपयुक्तता शतकापूर्वीच समजली होती, तोंड आणि नाक झाकून ते जिवाणू-हिंसा टाळण्यास सक्षम होते तसेच जिवाणूंचा शरीरात प्रवेश रोखू शकत होते. त्यामुळे त्यांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत मिळत असे.


जैन परंपरेने पर्यावरणपूरक आणि संतुलित जीवनशैली अंगीकारण्याची शिकवण दिली आहे. सूर्याच्या दैनंदिन संचलनानुसार जीवनशैली अंगीकारणे हा निरोगी राहण्याचा सोपा मार्ग आहे. हाच धडा जैन संतांच्या आदर्श जीवनशैलीकडे पाहून मिळत असल्याचे कोविंद यांनी सांगितले.


स्वानुभव मांडतांना राष्ट्रपती म्हणाले की, जैन धर्मातील विविध प्रवाहांशी माझा काही विशेष सहवास लाभला आहे आणि मला वेळोवेळी जैन संतांचा विशेष सहवास लाभला आहे, हे मी माझे सौभाग्य समजतो. मला वाटतं की जैन परंपरेत दानधर्माचे महत्त्व आहे, त्यामागे निसर्गाचा अकाट्य नियम आहे, त्यानुसार या जगात आपण जे काही देतो ते आपल्याला निसर्गाकडून अनेक वेळा परत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी