कोरोना संपलेला नाही; दक्ष रहा- राष्ट्रपती

नवी दिल्ली (हिं.स.) : कोरोना रोग पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी केले. दिल्लीच्या रोहिणी परिसरातील भगवान महावीर सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.


याप्रसंगी राष्ट्रपती म्हणाले की, सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की कोविड अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. मी सर्व देशवासियांना आवाहन करतो की त्यांनी पूर्णपणे सतर्क राहावे आणि सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. जैन धर्माच्या प्रवर्तकांना मास्कची उपयुक्तता शतकापूर्वीच समजली होती, तोंड आणि नाक झाकून ते जिवाणू-हिंसा टाळण्यास सक्षम होते तसेच जिवाणूंचा शरीरात प्रवेश रोखू शकत होते. त्यामुळे त्यांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत मिळत असे.


जैन परंपरेने पर्यावरणपूरक आणि संतुलित जीवनशैली अंगीकारण्याची शिकवण दिली आहे. सूर्याच्या दैनंदिन संचलनानुसार जीवनशैली अंगीकारणे हा निरोगी राहण्याचा सोपा मार्ग आहे. हाच धडा जैन संतांच्या आदर्श जीवनशैलीकडे पाहून मिळत असल्याचे कोविंद यांनी सांगितले.


स्वानुभव मांडतांना राष्ट्रपती म्हणाले की, जैन धर्मातील विविध प्रवाहांशी माझा काही विशेष सहवास लाभला आहे आणि मला वेळोवेळी जैन संतांचा विशेष सहवास लाभला आहे, हे मी माझे सौभाग्य समजतो. मला वाटतं की जैन परंपरेत दानधर्माचे महत्त्व आहे, त्यामागे निसर्गाचा अकाट्य नियम आहे, त्यानुसार या जगात आपण जे काही देतो ते आपल्याला निसर्गाकडून अनेक वेळा परत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत