कोरोना संपलेला नाही; दक्ष रहा- राष्ट्रपती

  87

नवी दिल्ली (हिं.स.) : कोरोना रोग पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी केले. दिल्लीच्या रोहिणी परिसरातील भगवान महावीर सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.


याप्रसंगी राष्ट्रपती म्हणाले की, सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की कोविड अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. मी सर्व देशवासियांना आवाहन करतो की त्यांनी पूर्णपणे सतर्क राहावे आणि सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. जैन धर्माच्या प्रवर्तकांना मास्कची उपयुक्तता शतकापूर्वीच समजली होती, तोंड आणि नाक झाकून ते जिवाणू-हिंसा टाळण्यास सक्षम होते तसेच जिवाणूंचा शरीरात प्रवेश रोखू शकत होते. त्यामुळे त्यांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत मिळत असे.


जैन परंपरेने पर्यावरणपूरक आणि संतुलित जीवनशैली अंगीकारण्याची शिकवण दिली आहे. सूर्याच्या दैनंदिन संचलनानुसार जीवनशैली अंगीकारणे हा निरोगी राहण्याचा सोपा मार्ग आहे. हाच धडा जैन संतांच्या आदर्श जीवनशैलीकडे पाहून मिळत असल्याचे कोविंद यांनी सांगितले.


स्वानुभव मांडतांना राष्ट्रपती म्हणाले की, जैन धर्मातील विविध प्रवाहांशी माझा काही विशेष सहवास लाभला आहे आणि मला वेळोवेळी जैन संतांचा विशेष सहवास लाभला आहे, हे मी माझे सौभाग्य समजतो. मला वाटतं की जैन परंपरेत दानधर्माचे महत्त्व आहे, त्यामागे निसर्गाचा अकाट्य नियम आहे, त्यानुसार या जगात आपण जे काही देतो ते आपल्याला निसर्गाकडून अनेक वेळा परत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके