नवी दिल्ली (हिं.स.) : देशात आज, मंगळवारी देशात अडीच हजारांहून अधिक कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. कालच्या तुलनेत १८.७ टक्के कमी रुग्ण संख्या आढळून आली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या २४ तासांत २ हजार ५६८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोविडमुळे आणखी २० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दिल्ली (१०७६), हरियाणा (४३९), केरळ (२५०), उत्तर प्रदेश (१९३) आणि कर्नाटकमध्ये (१११) आले आहेत. नवीन कोविड प्रकरणांपैकी ८०.५८ टक्के या पाच राज्यांमधून आले आहेत. फक्त दिल्लीचा वाटा ४१.९ टक्के आहे. गेल्या २४ तासात कोरोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात आतापर्यंत ५,२३,८८९ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यासोबतच गेल्या चोवीस तासांत २९११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या भारतात कोरोना रिकव्हरी रेट ९८.७४ टक्के आहे. भारतातील सक्रिय रुग्णांमध्येही घट झाली आहे. आता हा आकडा १९ हजार १३७ झाला आहे.
लस ही कोरोनाविरुद्धच्या लढाईतील सर्वात मजबूत शस्त्र आहे. गेल्या २४ तासांत १६ लाख २३ हजार ७९५ लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत देशात १८९ कोटींहून अधिक कोरोना प्रितबंधात्मक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…