काशीद बीच पर्यटकांनी बहरले...

संतोष रांजणकर


मुरूड : पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या काशीद-बिच समुद्र किनाऱ्यावर रविवारी पर्यटकांची मांदियाळी दिसून आल्याने येथील पर्यटन बहरून आल्याचे चित्र दिसून आले.


गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने येथील पर्यटनावर परिणाम झाला होता. कोरोना कहर ओसरल्यावर शासनाने निर्बंध हटविण्यात आल्याने येथील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले मात्र मागील आठवड्यापासून तसेच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात उष्णतेमुळे, हवामानातील बदलांमुळे पर्यटकांनी घरीच बसणे पसंत केले होते.


एप्रिल महिन्यात हवामानातील बदलामुळे दोन वेळा उष्णतेच्या लाटेमुळे पर्यटकांची संख्या रोडावली होती. २५ एप्रिलनंतर मुरूडमधील हवामानातील उष्णता हळूहळू कमी होऊ लागली आहे. मुरूडचे तापमान ५° अंशाने कमी झाल्यामुळे मुरूडकरांना व पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. याचाच परिणाम म्हणून मुरूडच्या दिशेने पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. त्यामुळे पर्यटकांचे मुरूडमधील सर्वात आवडते ठिकाण काशिद-बीचवर पर्यटकांची मोठी भरती आली आहे. काशिद-बीचवरील शुभ्र वाळू व सुरुची बने पर्यटकांना आकर्षित करतात.


मुंबईपासून सुमारे १३५ किमी व पुण्यापासून सुमारे १८० किमी अंतरावर असलेल्या काशिद-बिचला पर्यटक मोठ्या संख्येने पुन्हा एकदा येण्यास सुरुवात झाली आहे. मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ला, दत्त मंदिर, गारंबी, फणसाड अभयारण्य या ठिकाणांना पर्यटक आवर्जून भेट देतात. आता कुठे मुरूडला पर्यटक येऊ लागले असल्याने पर्यटन व्यवसायाला पुन्हा एकदा उभारी मिळाली आहे.


काशीद-बिच रस्त्यावर आज दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. समुद्रकिनारा पर्यटकांनी बहरला असल्याचे व त्यामुळे पर्यटन व्यवसायाला उभारी मिळाली असल्याचे चित्र दिसून आले.

Comments
Add Comment

'या' दिवशी सुरू होणार नेरळ माथेरान मिनी ट्रेन

नेरळ : ब्रिटीश काळात १९०७ साली सर आदमजी पिरभाय यांनी माथेरानात मिनी ट्रेन सुरू केली. दरवर्षी १४ जून रोजी

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर