काशीद बीच पर्यटकांनी बहरले...

संतोष रांजणकर


मुरूड : पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या काशीद-बिच समुद्र किनाऱ्यावर रविवारी पर्यटकांची मांदियाळी दिसून आल्याने येथील पर्यटन बहरून आल्याचे चित्र दिसून आले.


गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने येथील पर्यटनावर परिणाम झाला होता. कोरोना कहर ओसरल्यावर शासनाने निर्बंध हटविण्यात आल्याने येथील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले मात्र मागील आठवड्यापासून तसेच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात उष्णतेमुळे, हवामानातील बदलांमुळे पर्यटकांनी घरीच बसणे पसंत केले होते.


एप्रिल महिन्यात हवामानातील बदलामुळे दोन वेळा उष्णतेच्या लाटेमुळे पर्यटकांची संख्या रोडावली होती. २५ एप्रिलनंतर मुरूडमधील हवामानातील उष्णता हळूहळू कमी होऊ लागली आहे. मुरूडचे तापमान ५° अंशाने कमी झाल्यामुळे मुरूडकरांना व पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. याचाच परिणाम म्हणून मुरूडच्या दिशेने पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. त्यामुळे पर्यटकांचे मुरूडमधील सर्वात आवडते ठिकाण काशिद-बीचवर पर्यटकांची मोठी भरती आली आहे. काशिद-बीचवरील शुभ्र वाळू व सुरुची बने पर्यटकांना आकर्षित करतात.


मुंबईपासून सुमारे १३५ किमी व पुण्यापासून सुमारे १८० किमी अंतरावर असलेल्या काशिद-बिचला पर्यटक मोठ्या संख्येने पुन्हा एकदा येण्यास सुरुवात झाली आहे. मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ला, दत्त मंदिर, गारंबी, फणसाड अभयारण्य या ठिकाणांना पर्यटक आवर्जून भेट देतात. आता कुठे मुरूडला पर्यटक येऊ लागले असल्याने पर्यटन व्यवसायाला पुन्हा एकदा उभारी मिळाली आहे.


काशीद-बिच रस्त्यावर आज दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. समुद्रकिनारा पर्यटकांनी बहरला असल्याचे व त्यामुळे पर्यटन व्यवसायाला उभारी मिळाली असल्याचे चित्र दिसून आले.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग