काचळी - पिटकिरी खारभूमीच्या कामात मोठा गैरव्यवहार ?

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांनी खारलँड विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. समितीने गुरुवारी अलिबाग तालुक्यातील काचळी - पिटकिरी योजनेच्या बंधाऱ्याची पाहणी केली आणि तेथील निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी शेतकऱ्यांनी खारलँड विभागाच्या गलथान कारभाराचा पाढाच वाचला. आता समिती काय अहवाल देते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.


राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील ६ योजनांसाठी ११४ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. त्यातील अलिबाग तालुक्यातील काचळी - पिटकीरी योजनेच्या बंधाऱ्याला गुरुवारी विधिमंडळाच्या अंदाज समितीने भेट दिल्यावर खारभूमी विभागाचा गलथान कारभारावर सदस्यांनी खारभूमीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी खारभूमी विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे येथील पिकत्या भात शेतीची कशा प्रकारे वाट लागते आहे व ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे, याची वस्तुस्थिती समितीसमोर मांडली.


मागील दोन वर्षांपासून ६ किलोमीटर लांबीच्या काचळी - पिटकरी खारभूमी बंधाऱ्याचे काम सुरु आहे. या कामात अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी अनेकवेळा केलेली आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र, या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने येथील परिस्थितीमध्ये अजुनही काहीही सुधारणा झालेली नव्हती. आजही उधाणाचे पाणी थेट पिकत्या भातशेतीत शिरत आहे.


आ. रणजीत कांबळे अध्यक्ष असलेली विधिमंडळाची अंदाज समिती रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. अलिबाग येथे जिल्ह्यातील कामकाजाची चौकशी केल्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच या समितीने जिल्ह्यातील विविध कामांची प्रत्यक्ष पहाणी केली. त्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमाला बगल देत अंदाज समितीने काचळी-पिटकिरी खारभूमी योजनेला भेट दिली. यावेळी अंदाजे ७० गाड्यांचा ताफा आला होता. अधिकारी, लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच खारभूमीच्या बंधाऱ्यावर आले होते व परिसरातील शेतकरीही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


शेतकऱ्यांनी खारभूमीच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा पाढाच समिती सदस्यांसमोर वाचत येथील शेती नापीक करण्यात अधिकाऱ्यांचा कशा प्रकारे सहभाग आहे, याचे सत्यकथन केले. स्थितीचा अंदाज आल्याने समिती सदस्यही चांगलेच संतापले होते. त्यांनी खारभूमीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर धरत रखडलेल्या कामाचा आणि झालेल्या खर्चाचा जाब विचारला.

Comments
Add Comment

'या' दिवशी सुरू होणार नेरळ माथेरान मिनी ट्रेन

नेरळ : ब्रिटीश काळात १९०७ साली सर आदमजी पिरभाय यांनी माथेरानात मिनी ट्रेन सुरू केली. दरवर्षी १४ जून रोजी

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर