जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच अग्रभागी

तीन नगराध्यक्षांसह ७० नगरसेवक विजयी; दुसऱ्या स्थानावर शिंदेगट शिवसेना


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांची मतमोजणी पार पडल्यानंतर बाहेर आलेल्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) रायगडवासीयांनी पहिली पसंती दिल्याचे चित्र आहे. त्यापाठोपाठ शिवसेना (शिंदे गट) व भाजपच्या बाजूने कौल दिला असून, चौथ्या स्थानावर उबाठा व पाचव्या स्थानावर शेकाप राहिला आहे.


रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खोपोली, माथेरान आणि उरण या दहा नगरपरिषदांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. जिल्ह्यातील १० नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ३४, तर २०७ नगरसेवक पदांसाठी ५७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत होते. मतमोजणी रविवारी झाल्यानंतर जिल्ह्यातील १० पैकी मुरुड, रोहा, कर्जत नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) उमेदवार विजयी झाले आहेत, तर खोपोली, महाड, माथेरान नगरपरिषदेत शिवसेना, श्रीवर्धन शिवसेना (उबाठा), अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्ष, उरणमध्ये राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), पेणमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे नगराध्यक्ष पदाचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आलेले असले, तरी, २०७ नगरसेवक पदांच्या जागांसाठी सर्वाधिक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ७०, तर शिवसेना ५१ उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्या खालोखाल भाजपचे ३५, शिवसेना (उबाठा) २१, शेतकरी कामगार पक्ष २०, काँग्रेस ३, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार २ उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तसेच अपक्ष व इतर आघाड्यांचे ५ उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयी झाले.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या