नेरळ प्रादेशिक नळपाणी योजना मंजूर

नेरळ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील मोठ्या लोकवस्तीच्या नेरळ ग्रामपंचायतमधील नळपाणी योजना जुनी झाली होती. त्यामुळे पिण्याचे पाणी ग्रामस्थांना मुबलक स्वरूपात मिळत नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता. दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेरळ प्रादेशिक नळपाणी योजनेला मंजुरी दिली असून त्यासाठी २८ कोटी ६४ लाखांची तरतूद केली आहे.


नेरळ आणि ममदापुर ग्रामपंचायतची नळपाणी योजना १९९८ मध्ये तयार झाली होती. शिवसेना-भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर असताना तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांनी पुढाकार घेऊन नेरळ प्रादेशिक नळपाणी योजना मंजूर करून आणली होती. तर १९९९ मध्ये तत्कालीन आमदार सुरेश लाड यांच्या आमदारकीच्या काळात तत्कालीन सरपंच आयुब तांबोळी यांच्या सरपंच पदाच्या काळात या नळपणी योजनेचे लोकार्पण झाले होते.


साडेसात कोटींची नळपणी योजना वाढती लोकसंख्या आणि नेरळ मधील वाढते नागरीकरण लक्षात घेता नवीन मोठी नळपाणी योजना तयार करावी, अशी मागणी नेरळ ग्रामपंचायत कडून कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे केली होती. कालावधी संपलेल्या या नळपाणी योजनेचे पाणी नेरळ तसेच ममदापुर ग्रापपंचायत आणि कोल्हारे ग्रामपंचायतमधील काही भागाला दिले जात आहे.


२०१७ पर्यंत मुदत असलेल्या नेरळ नळपाणी योजनेची मुदत संपताना नवीन योजना कार्यन्वित होणे आवश्यक असते. मात्र, २०२२ साल उजाडले तरी नेरळ नळपाणी योजनेची मंजुरी मंत्रालयात अडकली आहे. नवीन नळपाणी योजना मंजूर होण्याची शक्यता नाही आणि स्थानिक कमी दाबाने होणाऱ्या पाण्यामुळे त्रस्त आहेत.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग