नेरळ प्रादेशिक नळपाणी योजना मंजूर

नेरळ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील मोठ्या लोकवस्तीच्या नेरळ ग्रामपंचायतमधील नळपाणी योजना जुनी झाली होती. त्यामुळे पिण्याचे पाणी ग्रामस्थांना मुबलक स्वरूपात मिळत नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता. दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेरळ प्रादेशिक नळपाणी योजनेला मंजुरी दिली असून त्यासाठी २८ कोटी ६४ लाखांची तरतूद केली आहे.


नेरळ आणि ममदापुर ग्रामपंचायतची नळपाणी योजना १९९८ मध्ये तयार झाली होती. शिवसेना-भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर असताना तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांनी पुढाकार घेऊन नेरळ प्रादेशिक नळपाणी योजना मंजूर करून आणली होती. तर १९९९ मध्ये तत्कालीन आमदार सुरेश लाड यांच्या आमदारकीच्या काळात तत्कालीन सरपंच आयुब तांबोळी यांच्या सरपंच पदाच्या काळात या नळपणी योजनेचे लोकार्पण झाले होते.


साडेसात कोटींची नळपणी योजना वाढती लोकसंख्या आणि नेरळ मधील वाढते नागरीकरण लक्षात घेता नवीन मोठी नळपाणी योजना तयार करावी, अशी मागणी नेरळ ग्रामपंचायत कडून कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे केली होती. कालावधी संपलेल्या या नळपाणी योजनेचे पाणी नेरळ तसेच ममदापुर ग्रापपंचायत आणि कोल्हारे ग्रामपंचायतमधील काही भागाला दिले जात आहे.


२०१७ पर्यंत मुदत असलेल्या नेरळ नळपाणी योजनेची मुदत संपताना नवीन योजना कार्यन्वित होणे आवश्यक असते. मात्र, २०२२ साल उजाडले तरी नेरळ नळपाणी योजनेची मंजुरी मंत्रालयात अडकली आहे. नवीन नळपाणी योजना मंजूर होण्याची शक्यता नाही आणि स्थानिक कमी दाबाने होणाऱ्या पाण्यामुळे त्रस्त आहेत.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.