ओंबळी येथे आपत्ती निवारा शेड उभारणार

पोलादपूर : तालुक्यातील ओंबळी गावात आपत्ती निवारा शेडच्या कामाचा भूमिपूजन व शुभारंभ मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले, जिल्हा सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, उद्योजक रामदास कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ओंबळीतील मुंबई, पुणे व ठाणे येथील चाकरमानी मंडळी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आपत्ती निवारा शेडमुळे ओंबळी गावासह परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने अतिवृष्टीच्या काळात व संभाव्य दुर्घटनांच्या वेळी नागरिकांना सुरक्षित आश्रय मिळावा, या उद्देशाने ही महत्त्वाची सुविधा उभारण्यात येत आहे. या कामांसाठी कोट्यवधी रुपये अंदाजित खर्च होणार आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी, ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांचे जिवित तसेच मालमत्तेची हानी टाळण्यासाठी अशा निवारा शेडची नितांत गरज असून, हा प्रकल्प आपत्तीकाळात लोकहितासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या