ओंबळी येथे आपत्ती निवारा शेड उभारणार

पोलादपूर : तालुक्यातील ओंबळी गावात आपत्ती निवारा शेडच्या कामाचा भूमिपूजन व शुभारंभ मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले, जिल्हा सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, उद्योजक रामदास कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ओंबळीतील मुंबई, पुणे व ठाणे येथील चाकरमानी मंडळी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आपत्ती निवारा शेडमुळे ओंबळी गावासह परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने अतिवृष्टीच्या काळात व संभाव्य दुर्घटनांच्या वेळी नागरिकांना सुरक्षित आश्रय मिळावा, या उद्देशाने ही महत्त्वाची सुविधा उभारण्यात येत आहे. या कामांसाठी कोट्यवधी रुपये अंदाजित खर्च होणार आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी, ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांचे जिवित तसेच मालमत्तेची हानी टाळण्यासाठी अशा निवारा शेडची नितांत गरज असून, हा प्रकल्प आपत्तीकाळात लोकहितासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित