विदर्भात ९० दिवसांत २७९ शेतकरी आत्महत्या

अमरावती (हिं.स.) : पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढतेच आहे. यावर्षी ३१ मार्चपर्यंत म्हणजेच ९० दिवसांत तब्बल २७९ मृत्यूला कवटाळले आहे असा धक्का दायक अहवाल विभागीय उपायुक्तांनी शासनाला सादर झालेला आहे. दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूचा फास आवळत असल्याचे वास्तव आहे. यामध्ये सर्वाधिक ८० शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत.


नैसर्गिक आपत्ती, नापिकी, कर्जबाजारीपणा, आजारपण, कर्जासाठी तगादा आदी कारो शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहेत. हलाखीच्या परिस्थितीत मुला-मुलींचे शिक्षण, लग्न कसे करावे, उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत, शेतकरी मृत्यूचा फास आवळत आहेत. मागील वर्षी विभवगवत १,१७३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. यंदा, जानेवारीत ८८, फेब्रुवारीत १०९ व मार्च महिन्यात ८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी शासनाने काही योजना दिल्यात. मात्र, यामध्ये गरजू शेतकऱ्याला लाभ मिळालेला नाही, अलीकडे पाऊसही बिनभरवशाचा झालेला आहे. कधी अतिपावसाने, तर कधी पावसाच्या अभावामुळे हातातोंडचा घास हिरावला जात असल्याने शेतकऱ्यांच्या विंवचनेत भर पडत आहे.


सन २००१ पासून १७,९३८ शेतकरी आत्महत्या


पश्चिम विदर्भात सन २००१ पासून महसूल विभागाकडे शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवण्यात येते. त्यानुसार आतापर्यत तब्बल १७,९३८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी फक्त ८,१६६ प्रकरणांमध्ये शासन मदत देण्यात आलेली आहे. तब्बल अर्ध्यापेक्षा जास्त ९,५३५ प्रकरणे शासन मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आलेली आहेत. २३७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.


शेतकरी आत्महत्यांची जिल्हानिहाय स्थिती


पश्चिम विदर्भात यंदा मार्चअखेर २७९ शेतकरी आत्महत्या झाल्या. यामध्ये सर्वाधिक ८० आत्महत्या अमरावती जिल्ह्यातील, अकोला जिल्ह्यात २९, यवतमाळ जिल्ह्यात ६९, बुलडाणा जिल्ह्यात ६१ व वाशिम जिल्ह्यात ४० आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये ६० प्रकरणांत शासन मदत देण्यात आलेली आहे. ५५ प्रकरणे अपात्र, तर १६४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पश्चिम विदर्भातशेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढतेच आहे. यावर्षी ३१ मार्चपर्यंत म्हणजेच ९० दिवसांत तब्बल २७९ मृत्यूला कवटाळले आहे असा धक्का दायक अहवाल विभागीय उपायुक्तां नी शासनाला सादर झालेला आहे. दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूचा फास आवळत असल्याचे वास्तव आहे. यामध्ये सर्वाधिक ८० शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत.


नैसर्गिक आपत्ती, नापिकी, कर्जबाजारीपणा, आजारपण, कर्जासाठी तगादा आदी कारो शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहेत. हलाखीच्या परिस्थितीत मुला-मुलींचे शिक्षण, लग्न कसे करावे, उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत, शेतकरी मृत्यूचा फास आवळत आहेत. मागील वर्षी विभवगवत १,१७३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. यंदा, जानेवारीत ८८, फेब्रुवारीत १०९ व मार्च महिन्यात ८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी शासनाने काही योजना दिल्यात. मात्र, यामध्ये गरजू शेतकऱ्याला लाभ मिळालेला नाही, अलीकडे पाऊसही बिनभरवशाचा झालेला आहे. कधी अतिपावसाने, तर कधी पावसाच्या अभावामुळे हातातोंडचा घास हिरावला जात असल्याने शेतकऱ्यांच्या विंवचनेत भर पडत आहे.

Comments
Add Comment

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’