विदर्भात ९० दिवसांत २७९ शेतकरी आत्महत्या

Share

अमरावती (हिं.स.) : पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढतेच आहे. यावर्षी ३१ मार्चपर्यंत म्हणजेच ९० दिवसांत तब्बल २७९ मृत्यूला कवटाळले आहे असा धक्का दायक अहवाल विभागीय उपायुक्तांनी शासनाला सादर झालेला आहे. दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूचा फास आवळत असल्याचे वास्तव आहे. यामध्ये सर्वाधिक ८० शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत.

नैसर्गिक आपत्ती, नापिकी, कर्जबाजारीपणा, आजारपण, कर्जासाठी तगादा आदी कारो शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहेत. हलाखीच्या परिस्थितीत मुला-मुलींचे शिक्षण, लग्न कसे करावे, उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत, शेतकरी मृत्यूचा फास आवळत आहेत. मागील वर्षी विभवगवत १,१७३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. यंदा, जानेवारीत ८८, फेब्रुवारीत १०९ व मार्च महिन्यात ८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी शासनाने काही योजना दिल्यात. मात्र, यामध्ये गरजू शेतकऱ्याला लाभ मिळालेला नाही, अलीकडे पाऊसही बिनभरवशाचा झालेला आहे. कधी अतिपावसाने, तर कधी पावसाच्या अभावामुळे हातातोंडचा घास हिरावला जात असल्याने शेतकऱ्यांच्या विंवचनेत भर पडत आहे.

सन २००१ पासून १७,९३८ शेतकरी आत्महत्या

पश्चिम विदर्भात सन २००१ पासून महसूल विभागाकडे शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवण्यात येते. त्यानुसार आतापर्यत तब्बल १७,९३८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी फक्त ८,१६६ प्रकरणांमध्ये शासन मदत देण्यात आलेली आहे. तब्बल अर्ध्यापेक्षा जास्त ९,५३५ प्रकरणे शासन मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आलेली आहेत. २३७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

शेतकरी आत्महत्यांची जिल्हानिहाय स्थिती

पश्चिम विदर्भात यंदा मार्चअखेर २७९ शेतकरी आत्महत्या झाल्या. यामध्ये सर्वाधिक ८० आत्महत्या अमरावती जिल्ह्यातील, अकोला जिल्ह्यात २९, यवतमाळ जिल्ह्यात ६९, बुलडाणा जिल्ह्यात ६१ व वाशिम जिल्ह्यात ४० आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये ६० प्रकरणांत शासन मदत देण्यात आलेली आहे. ५५ प्रकरणे अपात्र, तर १६४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पश्चिम विदर्भातशेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढतेच आहे. यावर्षी ३१ मार्चपर्यंत म्हणजेच ९० दिवसांत तब्बल २७९ मृत्यूला कवटाळले आहे असा धक्का दायक अहवाल विभागीय उपायुक्तां नी शासनाला सादर झालेला आहे. दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूचा फास आवळत असल्याचे वास्तव आहे. यामध्ये सर्वाधिक ८० शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत.

नैसर्गिक आपत्ती, नापिकी, कर्जबाजारीपणा, आजारपण, कर्जासाठी तगादा आदी कारो शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहेत. हलाखीच्या परिस्थितीत मुला-मुलींचे शिक्षण, लग्न कसे करावे, उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत, शेतकरी मृत्यूचा फास आवळत आहेत. मागील वर्षी विभवगवत १,१७३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. यंदा, जानेवारीत ८८, फेब्रुवारीत १०९ व मार्च महिन्यात ८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी शासनाने काही योजना दिल्यात. मात्र, यामध्ये गरजू शेतकऱ्याला लाभ मिळालेला नाही, अलीकडे पाऊसही बिनभरवशाचा झालेला आहे. कधी अतिपावसाने, तर कधी पावसाच्या अभावामुळे हातातोंडचा घास हिरावला जात असल्याने शेतकऱ्यांच्या विंवचनेत भर पडत आहे.

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

11 minutes ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

41 minutes ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

1 hour ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

1 hour ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

2 hours ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

2 hours ago