Categories: रायगड

सावित्री नदीची गाळसफाई आवश्यक

Share

शैलेश पालकर

पोलादपूर : दि. २३ जुलै २०२१ रोजी पोलादपूर शहरामध्ये उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पात्र घुसल्याने मटणमार्केटपासून स्मशानापर्यंत जलप्रलय निर्माण झाला होता. यामागे सावित्री नदीचे पात्र दिवसेंदिवस उथळ होत असल्याने पुराचे पाणी शहरात तब्बल ८ ते १२ फूट उंचीपर्यंत पूररेषा गाठत असल्याचे दिसून आले आहे. चरई गावातील साळवीवाडी आणि सोनारवाडीलगत दगडगोट्यांचे उंचवटे तयार झाल्याने पोलादपूर शहरातील पूरस्थितीनियंत्रणासाठी ठिकठिकाणी सावित्री नदीची गाळसफाई आवश्यक ठरत आहे.

२००५ मध्ये पोलादपूर शहरातील उत्तरवाहिनी सावित्री नदीला आलेल्या पूरपरिस्थितीत चरई पुलाचा चरईबाजूकडील ऍप्रोच रोड वाहून गेला. २०२१ मध्येही चरई बाजूकडील ऍप्रोच रोड वाहून गेल्याने पुराचे पाणी या ऍप्रोच रोडमुळे परत शहराकडे वळून पूरस्थिती निर्माण होत असल्याचा अंदाज लावला जात असताना पुराच्या पाण्याच्या पातळीतील वाढ तब्बल ८ ते १२ फूट उंच असल्याचे दिसून आल्याने उत्तरवाहिनी सावित्री नदी पात्रातील पोलादपूर शहरालगतचा तसेच चरई गावातील साळवीवाडी आणि सोनारवाडीलगत गाळ उपसा करण्याची गरज स्पष्ट झाली आहे. अखिल भारतीय सेनेचे पोलादपूरमधील कार्यकर्ते महेंद्र सकपाळ यांनी संपूर्ण पोलादपूर शहराच्या बाजूला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली असताना अन्य कोणत्याही राजकीय पक्षांना कोणत्याही उपाययोजना शासनाला सुचवण्यासंदर्भात सोयरसुतक नसल्याचे जाणवत आहे.

महाड शहरातील जुटे काढण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जात असताना पोलादपूर तालुक्यातूनच महाडकडे प्रचंड पुराच्या पाण्यासह सावित्री नदी वेगाने जात असल्याकडे राज्यकर्ते व प्रशासनाचे सपशेल दूर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे पोलादपूर शहर तसेच तालुक्यातील नद्यांचा गाळउपसा करण्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून आले आहे.

पोलादपूरच्या पुरानंतर लगेचच पोलादपूर नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली असताना उपाययोजनांच्या स्वप्नांची उधळण वेळोवेळी सत्ताधाऱ्यांकडून मतदारांवर झाली. प्रत्यक्षात कोणतीही कृती न झाल्याने २०२२ च्या आगामी पावसाळ्यात पुन्हा पोलादपुरकरांना पूरस्थितीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

15 minutes ago

Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…

33 minutes ago

अतिरेक्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू, ‘या’ दिवशी राज्यात येणार पार्थिव

मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…

34 minutes ago

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…

1 hour ago

OTT: या आठवड्यात फक्त ओटीटीवर अ‍ॅक्शन दिसणार, हे १२ चित्रपट प्रदर्शित होतील..

नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अ‍ॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…

1 hour ago

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

2 hours ago