जेलमध्ये गुणरत्न सदावर्ते केवळ ज्युसवर!

  77

मुंबई : गुणरत्न सदावर्ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये असून त्यांचे सध्या उपोषण सुरू आहे. मागच्या १५ दिवसांपासून सदावर्ते जेवत नसून ते ज्या ज्या पोलीस ठाण्याच्या कोठडीत होते, तिकडचे पोलीस वेळोवेळी सदावर्तेंना अन्न ग्रहण करण्याची विनंती करत होते. मात्र सदावर्ते सकाळ-संध्याकाळ केवळ ज्युस पित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्तापर्यंत गावदेवी, सातारा, कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंची कोठडी घेतली होती.


सदावर्ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. तिथे त्यांनी जेवण न करण्याचे ठरवले आहे. सरकारी वकील अरुणा पै यांनी ही माहिती दिली.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर केला असला तरी इतर गुन्ह्यांमधून त्यांची सुटका झालेली नाही. गुणरत्न सदावर्ते यांची रवानगी पुन्हा एकदा आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे.


दरम्यान, पुण्यातल्या विद्यापीठ पोलीस ठाण्यात वकील गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्याचा अर्ज केला होता, मात्र त्यांच्याकडे हा ताबा देण्यात आलेला नाही. पुढील कारवाई मुंबईतून होईल, असे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र