सरकारच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या मदतीने राज्यात उच्छाद!

Share

मुंबई : “राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. सरकार असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायदा हाती घेतला आहे. गेल्या आठवड्यापासून सरकारच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या मदतीने उच्छाद मांडला आहे. भाजपाच्या पोलखोल यात्रेवर शिवसैनिकांनी दगडफेक करत तोडफोड केली. मोहित कंबोज रस्त्यावरून जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नवनीत राणांच्या बाबतीतही केवळ हनुमान चालिसा पठण हा एकच विषय होता. शिवसैनिकांच्या त्यांच्या घरापर्यंत जाऊ देण्यात आले, त्यांना अडवले नाही. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री, त्या पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या डोळ्यादेखत गुंडगिरी करत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात सरकारपुरस्कृत दहशत, गुंडगिरी झाली नाही. या गुंडगिरीचे समर्थन शिवसेना नेते करतात. सरकार आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. आणखी जर तुम्ही आक्रमक होणार असाल तर आम्ही हात बांधून गप्प बसणार नाही. जसे मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारल्यावर माशी डसते. तसे उत्तर आम्हीही देऊ शकतो. पण आम्ही कायदा पाळणारे आहोत. कायद्याला मानणारे आहोत. आम्ही याबाबत चोख उत्तर देऊ,” असा इशारा भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर काल रात्री शिवसैनिकांनी हल्ला केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानासमोरून जात असताना शिवसैनिकांनी हल्ला करत कंबोज यांच्यावर मातोश्रीच्या परिसराची रेकी केल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपा आक्रमक झाली असून आज भाजपाच्या मुंबईतल्या आमदारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “भाजपाचा संघर्षाचा इतिहास आहे. भाजपा नेत्यांनी टोकाचा संघर्ष केला आहे. आमच्या शेपटावर पाय ठेवून डिवचण्याचा प्रयत्न केला तर भाजपा शांत बसणार नाही. भाजपाही टिट फॉर टॅट करू शकते. पण आम्ही कायद्याला मानणारे, लोकशाही मानणारे आहोत. त्यामुळे कायद्याच्या मार्गाने जे करता येईल ते करू. आम्ही पोलिसात जाऊन आय़ुक्तांना निवेदन देऊ. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू. या हल्ल्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही काल केली आहे. आज सरकारच्या माध्यमातून होत असलेला दहशत पसरवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्री मूग गिळून गप्प आहे. मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था हातात घ्यायला मोकळीक दिली आहे. राज्याच्या संस्कृतीला काळिमा लावण्याची कृती केलेली आहे”.

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

7 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

8 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

9 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

9 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

10 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

11 hours ago