खिलाडू वृत्ती जोपासल्यास समस्येशी सामना : फडणवीस

कल्याण (वार्ताहर) : जीवनात खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे. खेळाडू वृत्ती असल्यास जीवनात कोणत्याही समस्येला समोरे जाता येते, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. कल्याणमध्ये भाजप कार्यकर्ते अरुण दिघे यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.


कल्याण पूर्व भागातील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि हनुमान सेवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भाजप कार्यकर्ते अरुण दिघे यांच्या स्मरणार्थ बुधवारी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.


याप्रसंगी फडणवीस यांनी कबड्डी हा आपल्या मातीतील देशी खेळ आहे. या प्रकारच्या स्पर्धा आयोजनातून कबड्डी खेळणारे खेळाडू हे तालुका, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर जावेत, अशी आपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्राच्या मातीत कबड्डीचे चांगले खेळाडू घडले असल्याचे सांगितले.


या उद्घाटन कार्यक्रमास आमदार गणपत गायकवाड, आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे उपस्थित होते.

Comments
Add Comment

Thane News : ठाणे हादरलं! 'जीवंत सोडणार नाही' धमकी दिली अन् १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला... बंद घरात नेमकं काय घडलं?

ठाणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या १७ वर्षीय मैत्रिणीला पेटवून दिल्याचा अत्यंत

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ठाण्यात वाघीण मैदानात! चित्रा वाघ ॲक्शन मोडवर; वाघ यांच्या एन्ट्रीने अनेकांची धाकधूक वाढली!

कळवा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज

नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त ठाणे  : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा

सुजाता मडके या शहापूरच्या कन्येची ‘इस्रो’मध्ये थरारक झेप

ठाणे : ‘यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते,’ या शब्दात

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह