खिलाडू वृत्ती जोपासल्यास समस्येशी सामना : फडणवीस

  159

कल्याण (वार्ताहर) : जीवनात खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे. खेळाडू वृत्ती असल्यास जीवनात कोणत्याही समस्येला समोरे जाता येते, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. कल्याणमध्ये भाजप कार्यकर्ते अरुण दिघे यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.


कल्याण पूर्व भागातील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि हनुमान सेवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भाजप कार्यकर्ते अरुण दिघे यांच्या स्मरणार्थ बुधवारी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.


याप्रसंगी फडणवीस यांनी कबड्डी हा आपल्या मातीतील देशी खेळ आहे. या प्रकारच्या स्पर्धा आयोजनातून कबड्डी खेळणारे खेळाडू हे तालुका, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर जावेत, अशी आपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्राच्या मातीत कबड्डीचे चांगले खेळाडू घडले असल्याचे सांगितले.


या उद्घाटन कार्यक्रमास आमदार गणपत गायकवाड, आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे उपस्थित होते.

Comments
Add Comment

ठाण्यात ८० हजार कुटुंबांचे धोकादायक इमारतींत वास्तव्य

इमारती रिकाम्या करण्यास रहिवाशांचा विरोध ठाणे : विरारमध्ये इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची

Raj Thackeray on Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले...

ठाणे: मराठा आरक्षणाच्या विषयावरुन मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. आज त्यांच्या

गणेशमूर्तींचा बोटीने प्रवास, भिवंडीकरांचा कोंडीवर उपाय

भिवंडी (प्रतिनिधी) : वाहतूक कोंडीचे विघ्न बाप्पांच्या मार्गातही येत आहे. वाहतूक कोंडीचा त्रास ठाणे जिल्ह्यातील

Eknath Shinde: रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या बाईकस्वाराच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री, ताफा थांबवून केली मदत

ठाणे: आज सगळीकडे गणेशोस्तवाची धूम सुरू असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर एक अपघात घडला. एक

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या