गहू-तांदळापेक्षा दूध उत्पादनात भारत अव्वल: मोदी

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारत दरवर्षी ८.५ लाख कोटी रुपयांच्या दुधाचे उत्पादन करतो. दुधातून होणारी उलाढाल ही गहू आणि तांदळापेक्षा जास्त आहे. तसेच लहान शेतकरी दुग्ध व्यवसायातील सर्वात मोठे लाभार्थी आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आज त्यांनी बनास कांठामधील दियोदर येथे नवीन डेअरी कॉम्प्लेक्स आणि बटाटा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते.


आज भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांची उपजीविका दुधावर अवलंबून असताना, भारत वर्षाला ८.५ लाख कोटी रुपयांचे दूध उत्पादन करतो. पण याकडे बड्या अर्थतज्ज्ञांसह देशातील अनेक लोकांचे दुर्लक्ष होतेय. खेड्यांमधील विकेंद्रित अर्थव्यवस्था याचे उदाहरण आहे. गहू आणि तांदळामधून होणारी उलाढाल देखील दुधाच्या उत्पादनइतकी नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम बनविणे हाच नवीन डेअरी कॉम्प्लेक्स आणि बनास डेअरीच्या बटाटा प्रक्रिया प्रकल्पाचा उद्देश आहे. तसेच या प्रकल्पाद्वारे या प्रदेशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यात येईल, असेही पंतप्रधान म्हणाले. तसेच चीज उत्पानद प्रकल्प, दामा येथील सेंद्रीय खत प्रकल्प हे सर्व देशाला समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे