मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

  136

सलग सुट्ट्यांमुळे परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी


अलिबाग (प्रतिनिधी) : मुंबई - गोवा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. माणगाव ते लोणेरे दरम्यान ही कोंडी झाली असून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.


गुरुवार ते रविवार अशा सलग ४ दिवस सुट्ट्या आल्याने लोक फिरायला मोठ्या संख्येने बाहेर पडले तर परीक्षा संपल्याने अनेकांनी गावी जाण्याचा बेत आखला. गावोगावच्या देवदेवतांचे जत्रोत्सव, हनुमान जयंतीचा उत्सव यामुळे लोक कोकणात आपल्या गावी आले होते.


४ दिवसांची सुट्टी संपवून लोक पुन्हा मुंबईकडे परतत आहेत. त्यामुळे महामार्गावर प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे. माणगाव बाजारपेठ ते लोणेरे हायवे नाका इथपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. महाड ते कोलाड या तासाभराच्या प्रवासाला अडीच तास लागत आहेत. काही ठिकाणी महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे अर्धवट आहेत.


प्रत्येकाला मुंबईत लवकर पोहोचण्याची घाई होती. त्यामुळे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहने चालवली जात आहेत. परिणामी ही वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलीस ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.


मात्र ही कोंडी सोडवायला पोलीस बळ कमी पडत असल्याचे दिसून येते त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Ajit Pawar: माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं!

पुणे: प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पारडं

Passenger Jump from Plane: आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी विमानातून मारल्या उड्या, १८ जण जखमी; कुठे घडली ही घटना? जाणून घ्या

स्पेन: गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर, विमानांच्या लहान-मोठ्या अपघातांबद्दलच्या

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या