सांगली मिरज भागात अवकाळी पाऊस, फळबागांचे नुकसान

सांगली : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी या अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यातच आज दुपारी सांगली आणि मिरज शहरामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस पडला. सुमारे अर्धा तास धुवाधार पाऊस पडला. यामुळे द्राक्ष शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान अवकाळी पावसाने होत आहे.


विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊसही शहराच्या काही भागात झाला. त्यामुळे उकड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला खरा. मात्र, अचानक झालेल्या या अवकाळी पावसाने सांगलीकरांची मोठी दैना उडाली.


शनिवारच्या आठवड्या बाजारातील विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. अवकाळी झालेल्या पावसामुळे शहरातल्या अनेक सखल भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

Todays Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; ग्राहकांमध्ये संभ्रम, जाणून घ्या आजचे (४ मार्च) ताजे दर!

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला

Heat alert : हवामानाचा लपंडाव : अयोध्येत हुडहुडी तर अकोल्यात लाहीलाही! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट, दुपारनंतर...

महाराष्ट्रातील हवामानात सध्या कमालीची अनिश्चितता पाहायला मिळत आहे. अवघ्या आठवड्याभरापूर्वी ज्या राज्यात

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे.