उड्डाणपुलाच्या नावावरून कलगीतुरा

  70

पालघर (प्रतिनिधी) : नायगाव पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. तो लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला होण्याच्या प्रतीक्षेत नागरिक असतानाच या उड्डाणपुलाला कोणाचे नाव द्यायचे, यावरून राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे.


नायगाव पूर्व व पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी गेली सत्तर ते पंचाहत्तर वर्षे रस्ता उपलब्ध नव्हता. या मार्गातून रेल्वे जात असल्यामुळे रस्ता तयार करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे या दोन्ही परिसरांतील नागरिकांना द्राविडी प्राणायाम करावा लागत असे. यामध्ये नागरिकांना इंधनाचा खर्च व पदरमोड करावी लागत असे. दरम्यान, या सारया अडचणींचा विचार करून सात वर्षांपूर्वी येथे उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी देण्यात आली. पण पुलाचे काम सुरू होत नव्हते.


चार वर्षांपूर्वी कामास सुरुवात झाली, पण कालांतराने काही अडचणी उभ्या राहिल्या व पुलाचे काम रखडले. विविध विभागांच्या परवानग्या मिळवणे व स्थानिक पातळीवरील समस्यांवर मात करत प्रशासनाने अखेर काम सुरू केले व अल्पावधीत उड्डाणपूल उभारला. पण आता या उड्डाणपुलाला कोणाचे नाव द्यायचे यावरून राजकीय पक्षांमध्ये हमरीतुमरी सुरू झाली आहे.


शिवसेनेने स्थानिक नेते स्व. धर्माजी पाटील, काँग्रेसने स्व. मायकल फुटयार्डो, भाजपने माजी खासदार स्व. चिंतामण वनगा, मुस्लिम ट्रस्टने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा नावांची शिफारस केली आहे. नावाचा हा वाद आता रंगू लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी नायगाव उड्डाणपूल असे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

न्यू इंग्लिश स्कूल सोनाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू

वाडा : वाडा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे या विद्यालयात एका पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गेल्या दि.

४०० खाटांच्या हॉस्पिटलसाठी सातबाऱ्याचा अडसर!

२५ कोटींचा निधी डीपीसीकडे पडून विरार : नालासोपारा मौजे आचोळे, येथे प्रस्तावित असलेल्या ४०० खाटांच्या

वसई -विरार शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य

कचराकुंडीत कचरा जमा करण्याचे पालिकेकडून आवाहन वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढते

घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदारांची स्पर्धा

कंत्राटासाठी पहिल्यांदाच ४६ निविदा  विरार : वसई-विरार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने मागविण्यात

खोडाळा हायस्कूलचे पत्रे पावसाळ्यातही गायब !

मोखाडा : खोडाळा येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ संस्थेची अनुदानित शाळा आहे. या शाळेत खोडाळा आणि