उड्डाणपुलाच्या नावावरून कलगीतुरा

पालघर (प्रतिनिधी) : नायगाव पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. तो लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला होण्याच्या प्रतीक्षेत नागरिक असतानाच या उड्डाणपुलाला कोणाचे नाव द्यायचे, यावरून राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे.


नायगाव पूर्व व पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी गेली सत्तर ते पंचाहत्तर वर्षे रस्ता उपलब्ध नव्हता. या मार्गातून रेल्वे जात असल्यामुळे रस्ता तयार करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे या दोन्ही परिसरांतील नागरिकांना द्राविडी प्राणायाम करावा लागत असे. यामध्ये नागरिकांना इंधनाचा खर्च व पदरमोड करावी लागत असे. दरम्यान, या सारया अडचणींचा विचार करून सात वर्षांपूर्वी येथे उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी देण्यात आली. पण पुलाचे काम सुरू होत नव्हते.


चार वर्षांपूर्वी कामास सुरुवात झाली, पण कालांतराने काही अडचणी उभ्या राहिल्या व पुलाचे काम रखडले. विविध विभागांच्या परवानग्या मिळवणे व स्थानिक पातळीवरील समस्यांवर मात करत प्रशासनाने अखेर काम सुरू केले व अल्पावधीत उड्डाणपूल उभारला. पण आता या उड्डाणपुलाला कोणाचे नाव द्यायचे यावरून राजकीय पक्षांमध्ये हमरीतुमरी सुरू झाली आहे.


शिवसेनेने स्थानिक नेते स्व. धर्माजी पाटील, काँग्रेसने स्व. मायकल फुटयार्डो, भाजपने माजी खासदार स्व. चिंतामण वनगा, मुस्लिम ट्रस्टने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा नावांची शिफारस केली आहे. नावाचा हा वाद आता रंगू लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी नायगाव उड्डाणपूल असे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार