उड्डाणपुलाच्या नावावरून कलगीतुरा

पालघर (प्रतिनिधी) : नायगाव पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. तो लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला होण्याच्या प्रतीक्षेत नागरिक असतानाच या उड्डाणपुलाला कोणाचे नाव द्यायचे, यावरून राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे.


नायगाव पूर्व व पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी गेली सत्तर ते पंचाहत्तर वर्षे रस्ता उपलब्ध नव्हता. या मार्गातून रेल्वे जात असल्यामुळे रस्ता तयार करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे या दोन्ही परिसरांतील नागरिकांना द्राविडी प्राणायाम करावा लागत असे. यामध्ये नागरिकांना इंधनाचा खर्च व पदरमोड करावी लागत असे. दरम्यान, या सारया अडचणींचा विचार करून सात वर्षांपूर्वी येथे उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी देण्यात आली. पण पुलाचे काम सुरू होत नव्हते.


चार वर्षांपूर्वी कामास सुरुवात झाली, पण कालांतराने काही अडचणी उभ्या राहिल्या व पुलाचे काम रखडले. विविध विभागांच्या परवानग्या मिळवणे व स्थानिक पातळीवरील समस्यांवर मात करत प्रशासनाने अखेर काम सुरू केले व अल्पावधीत उड्डाणपूल उभारला. पण आता या उड्डाणपुलाला कोणाचे नाव द्यायचे यावरून राजकीय पक्षांमध्ये हमरीतुमरी सुरू झाली आहे.


शिवसेनेने स्थानिक नेते स्व. धर्माजी पाटील, काँग्रेसने स्व. मायकल फुटयार्डो, भाजपने माजी खासदार स्व. चिंतामण वनगा, मुस्लिम ट्रस्टने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा नावांची शिफारस केली आहे. नावाचा हा वाद आता रंगू लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी नायगाव उड्डाणपूल असे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

‘हॅप्पी न्यू इयर’चा एक मेसेज करू शकतो बँक खाते रिकामे

सफाळे पोलिसांकडून सायबर स्कॅमबाबत हाय अलर्ट सफाळे : नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र असतानाच, सायबर

नवली उड्डाणपुलावर पतंगाच्या मांज्यामुळे अपघात

पालघर : पालघर शहरातील नवली येथील नवीन ब्रिजवरून प्रवास करत असताना पतंगाच्या धारदार मांज्यामुळे एका तरुणाचा कान

भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांना संधी

संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता

११५ जागांसाठी ९४९ उमेदवारी अर्ज दाखल

शेवटच्या दिवशी इच्छुकांची एकच गर्दी विरार : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिलेल्या

बोईसरकरांच्या प्रतिसादाने पास्थळचे ‘आंबटगोड’ मैदान दुमदुमले

‘दैनिक प्रहार’ पुरस्कृत पास्थळ महोत्सव २०२५ पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि

६२१ कोटी खर्चूनही मुंबई-अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांतच!

व्हाईट टॉपिंगच्या निकृष्ट कामामुळे वाहतूक कोंडी वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी