भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांना संधी

संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी


गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ११५ पैकी ८८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि भाजप संघटनेतील पदाधिकाऱ्यांना नगरसेवक बनण्याची संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उमेदवारी देताना भाजपने सर्वच समाजघटकांचा विचार केलेला आहे.


वसई-विरार महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुती म्हणून लढत आहे. श्रमजीवी संघटना आणि आगरी सेनेला सुद्धा महायुतीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. महापालिकेच्या ११५ जागांपैकी ८८ जागा भाजप लढवित असून, शिवसेना २७ जागांवर लढत आहे. श्रमजीवी आणि आगरी सेनेला भाजपच्या कोट्यातूनच उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, पालघर लोकसभा आणि जिल्ह्यातील पाच विधानसभा जिंकल्यानंतर आणखी संघटन मजबूत केलेल्या भाजपने नुकताच झालेल्या नगरपरिषद ,नगरपंचायत निवडणुकीमध्ये दोन नगराध्यक्षांसह ५० नगरसेवक निवडून आणले आहेत. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम भाजपने केले आहे. वसई विरार मध्ये सुद्धा पक्ष वाढीसाठी कार्य करणाऱ्या अनेक पदाधिकारी,कार्यकर्त्यांना भाजपने महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली आहे.


भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, माजी विधानसभा प्रमुख मनोज पाटील, महामंत्री विश्वास सावंत, उपाध्यक्ष नारायण मांजरेकर, युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके, प्रदेश सचिव अपर्णा पाटील, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष मॅथ्यू कोलासो, सरचिटणीस विजेंद्र सिंग,युवा मोर्चा आघाडी अध्यक्ष विनित तिवारी, वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर, वसई पूर्व वालीव मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, नालासोपारा तुळींज मंडळ अध्यक्ष प्रमोद सिंग, विरार पश्चिम मंडळ अध्यक्ष विशाल राऊत, वसई ग्रामीण पश्चिम अध्यक्ष आशिष जोशी यांच्या पत्नी मनिषा जोशी यांच्यासह उत्तम कुमार, रवी पुरोहित, गौरव राऊत, जॉन बावटीस, युगा वर्तक, स्मिता लोपीस, मेहुल शहा, राजीव म्हात्रे, पिंकी कवर- राठोड, ॲड. दर्शना त्रिपाठी, दीपा चावडे, गणेश पाटील, कमलेश खटावकर, नीतू झा, सुचिता शेट्टी, श्रमजीवीचे महेश धांगडा आणि आगरी सेनेच्या विजय घरत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


१४ उत्तर भारतीय निवडणूक रिंगणात


महापालिका निवडणुकीच्या आनुषंगाने उत्तर भारतीय समाजामध्ये भाजप विरोधी वातावरण करण्याचा प्रयत्न काहींकडून केल जात होता. विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर भारतीय मतदारांचा उपयोग करून घेण्यात आला. असा संदेश पसरविणाऱ्यांना भाजपने चांगलीच चपराक दिली आहे.या निवडणुकीत भाजपने १४ उत्तर भारतीय नागरिकांना उमेदवारी दिली आहे.


Comments
Add Comment

Heatwave : उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या

Janhavi kapoor :वजन कमी करण्यासाठी जान्हवी कपूरने दिला सल्ला; म्हणाली…

वजन वाढणे किंवा वजन कमी होणे या समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. बदलती जीवनशैली आणि आरोग्याच्या विविध

Sairat :आकाश सोबतच्या पोस्टवर अखेर रिंकू राजगुरूने स्वत: केला खुलासा !

सैराट चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टिला एक वेगळी दिशा मिळाली. जगभरात १०० कोटींची कमाई करणारा 'सैराट' हा पहिला

Ranveer singh :धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वरील बंदी प्रकरणी FWICE चा खुलासा

मुंबई : धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वर बॉलिवूडने बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आले. या प्रकरणी आता

Police misguidance : दारूचा नाद लई बेक्कार ! थेट पोलिसांना कॉल केला अन...

अकोला : दारूच्या नशेत वाघापूर येथील एका तरुणाने चक्क पोलिसांना फोन केला आणि खोटी माहिती दिल्याचा प्रकार समोर आला

Nashik : शाळेत प्रवेश द्या; मी अंध आहे, ही माझी चूक आहे का? प्रवेशासाठी अंध विद्यार्थ्याचे आर्त आवाहन

नाशिक : “मी अंध आहे, ही माझी चूक आहे का? मला शिकण्याचा अधिकार नाही का?” असा हृदय पिळवटून टाकणारा सवाल एका गरीब अंध