मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन बोललो होतो

  55

मुंबई : आम्ही विकासाच्या दृष्टीने कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक लढवली होती. याठिकाणी मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन असे म्हटले होते. आमचे नाना कदम लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो नाही, असे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. तसेच हिंदुत्व हा आमचा अजेंडा नाही तर श्वास आहे. कोल्हापुरातील निवडणुकीत आम्ही विकासाचे मुद्दे मांडले, हिंदुत्वाबाबत लपवाछपवी केली नाही. आम्ही कुठे कमी पडलो याचे चिंतन करण्यात येईल, अशा शब्दात चंदक्रांत पाटील यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.


चंदक्रांत पाटील म्हणाले की, कोल्हापूर उत्तरमध्ये ३ पक्ष विरुद्ध भाजपा एकटी लढली. भाजपाने एकट्याने ७७ हजार मते मिळवली. त्यामुळे पराभवाची कारणे शोधण्यात येतील. मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. आम्हाला कुठलाही पश्चाताप नाही. प्रत्येक पक्षाचे धोरण वेगवेगळे असते. भाजपाच्या १५ महिला आमदार आहेत. जयश्री जाधव या भाजपाच्या होत्या परंतु काँग्रेस सत्तेत असल्याने त्याठिकाणी जाऊन त्यांनी निवडणूक लढवली. आम्ही सत्तेत असतो तर आमच्या बाजूने त्या लढल्या असत्या, असे ते म्हणाले.


ज्या झाडाला चांगले आंबे असतात त्यालाच दगडं मारली जातात. चंद्रकांत पाटील लढले असते तर तुम्हाला कुणाला उभे करायचा हा प्रश्न निर्माण झाला असता. संघटना उत्तमपणे निवडणूक लढली, असे चंद्रकांत पाटलांनी टिकाकारांना उत्तर देताना सांगितले.


कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव या १८ हजारांच्या मताधिक्यांने विजयी झाल्या. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाण्याची भाषा केली होती त्याची आठवण लोक करून देतात, मी त्यावर भाष्य करणार नाही, असे विधान पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले होते. तसेच सोशल मीडियावरही चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

Comments
Add Comment

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा