मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन बोललो होतो

मुंबई : आम्ही विकासाच्या दृष्टीने कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक लढवली होती. याठिकाणी मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन असे म्हटले होते. आमचे नाना कदम लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो नाही, असे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. तसेच हिंदुत्व हा आमचा अजेंडा नाही तर श्वास आहे. कोल्हापुरातील निवडणुकीत आम्ही विकासाचे मुद्दे मांडले, हिंदुत्वाबाबत लपवाछपवी केली नाही. आम्ही कुठे कमी पडलो याचे चिंतन करण्यात येईल, अशा शब्दात चंदक्रांत पाटील यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.


चंदक्रांत पाटील म्हणाले की, कोल्हापूर उत्तरमध्ये ३ पक्ष विरुद्ध भाजपा एकटी लढली. भाजपाने एकट्याने ७७ हजार मते मिळवली. त्यामुळे पराभवाची कारणे शोधण्यात येतील. मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. आम्हाला कुठलाही पश्चाताप नाही. प्रत्येक पक्षाचे धोरण वेगवेगळे असते. भाजपाच्या १५ महिला आमदार आहेत. जयश्री जाधव या भाजपाच्या होत्या परंतु काँग्रेस सत्तेत असल्याने त्याठिकाणी जाऊन त्यांनी निवडणूक लढवली. आम्ही सत्तेत असतो तर आमच्या बाजूने त्या लढल्या असत्या, असे ते म्हणाले.


ज्या झाडाला चांगले आंबे असतात त्यालाच दगडं मारली जातात. चंद्रकांत पाटील लढले असते तर तुम्हाला कुणाला उभे करायचा हा प्रश्न निर्माण झाला असता. संघटना उत्तमपणे निवडणूक लढली, असे चंद्रकांत पाटलांनी टिकाकारांना उत्तर देताना सांगितले.


कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव या १८ हजारांच्या मताधिक्यांने विजयी झाल्या. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाण्याची भाषा केली होती त्याची आठवण लोक करून देतात, मी त्यावर भाष्य करणार नाही, असे विधान पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले होते. तसेच सोशल मीडियावरही चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

Comments
Add Comment

भाजपचा मोठा गेमप्लॅन: नगराध्यक्षपदासाठी 'गुप्‍त' चाचपणी; ऐनवेळी घोषणा!

निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नगराध्यक्षपदाचे उमेदवार ठरवले; महायुतीचा 'प्लॅन बी' तयार? मुंबई : महाराष्ट्रातील

फडणवीसांनी युतीचा पेच सोडवला! जागा वाटपावर मतभेद असले तरी 'पोस्ट पोल युती' निश्चित

फडणवीसांनी कोल्हापुरात सोडले उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र! कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची

पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्या ठार ; वनविभागाची कारवाई

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या

वर्धा शहरातील रामनगर येथील भूखंड मालकी हक्काने देण्यास मंजुरी

मुंबई : वर्धा नगरपरिषदेच्या मालकीचे रामनगरमधील भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने करून

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम कार्यक्रमासाठी ९५.३५ कोटींची तरतूद

मुंबई : शिख धर्माचे नववे गुरू आणि ‘हिंद-की-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी

मच्छिमारांना कर्जावर चार टक्के व्याज सवलत

मुंबई : राज्यातील मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादकांसह किसान क्रेडिट कार्डधारक मत्स्यव्यावसायिकांना २