मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांवरुन हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच मनसेकडून महाआरतीचे आयोजन केल्यानंतर शिवसेनेकडून देखील दादरमध्ये अशाच प्रकारे महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदा सरवणकर यांच्या माध्यमातून हे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये हनुमान जयंतीच्या महाआरतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेने महाआरतीचे आयोजन केल्यानंतर त्यावरून मनसेकडून खोचक शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे.
राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरीत होऊन त्यांनी देखील महाआरतीचे आयोजन केले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. हीच भूमिका त्यांनी ३ तारखेनंतर देखील कायम ठेवावी. आज महाआरती करत आहात. पण शरद पवारांची यासाठी परवानगी घेतली आहे का हे देखील तपासून घ्यावे. नाहीतर आज महाआरती करतील आणि ३ तारखेनंतर पळून जातील”, असे संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या हस्ते हनुमान जयंतीनिमित्त दादरच्या हनुमान मंदिरात पूजा करण्यात आली. मनसेकडून हनुमान चालीसा पठण देखील करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे विचारताच पोलीस आमच्यासोबत असल्याचे ते म्हणाले.
पुनर्विकास एमएमआरडीए करणार; फडणवीस-शिंदेंचा थेट दिलासा! मुंबई : एल्फिन्स्टन पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या १९ इमारतींबाबत…
नवी दिल्ली : एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या इयत्ता सातवीच्या पुस्तकातून मुघल आणि दिल्ली राजवटीचे सर्व…
मुंबई : पहलगाममध्ये धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, २६ निष्पापांचा बळी गेला, त्यात महाराष्ट्राच्या ६…
पहलगाम हल्ल्यावरील काँग्रेसच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने साधला निशाणा नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी…
नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता. या…
मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने नुकताच विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर…