देशातील ९ कोटी ४० लाख घरांमध्ये नळाद्वारे पाणी

ठाणे (प्रतिनिधी) : घरोघरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्याच्या जल जीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे देशातील ९ कोटी ४० लाख घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती भाजपचे आमदार व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी पत्रकान्वये दिली. भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने नरेंद्र मोदी सरकारने विविध कल्याणकारी कामे केली आहेत. त्यानुसार जल जीवन मिशनसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार डावखरे यांनी दिली.


नरेंद्र मोदी सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक घरात २०२४ पर्यंत नळाने पाणीपुरवण्याचा संकल्प केला आहे. ग्रामीण भागातील जनतेला विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पायपिटीतून मुक्त करणे, या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली. ९ एप्रिल २२ पर्यंत ९ कोटी ४० लाख घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवले जात आहे. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत नळाद्वारे पाणी पुरविल्या जाणाऱ्या घरांची संख्या ३ कोटी २३ लाख इतकी होती.


तीन वर्षांत आणखी ६ कोटी १५ लाख घरांना नळाद्वारे पाणी पुरविण्यात आले. देशातील १०६ जिल्हे व १ लाख ४५ हजार गावांमध्ये प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्याच्या योजनेची वेगाने अंमलबजावणी होत आहे. देशातील दीड लाख गावांतील घरांमध्ये जल जीवन अभियानाची १०० टक्के अंमलबजावणी झाली आहे, असे आमदार डावखरे यांनी सांगितले आहे. नरेंद्र मोदी सरकारने आता शहरी भागातही ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत १७ लाख ३९ हजार शाळा आणि अंगणवाड्यांमध्येही नळाद्वारे पाणी पुरविले जात आहे.


या अभियानासाठी ५ वर्षांत ३ लाख ६० हजार कोटी एवढी तरतूद करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला. ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी मैलो न मेल पायपीट करावी लागते. दुर्गम आणि पहाडी भागातील जनतेलाही पाण्यासाठी वणवण करावी लागते. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे महिलांचे पाणी आणण्यासाठीच कष्ट वाचले आहेत. ग्रामीण भागात एकूण घरांची संख्या १९ कोटी ३१ लाख एवढी आहे. घरोघरी नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट लवकरच साध्य होईल, असेही आमदार डावखरे यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये