विक्रमगड (वार्ताहर) : विक्रमगड तालुक्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली असून खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील धोडीपाडा येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी विक्रमगड पंचायत समिती पाणीपुरवठा विभागात पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे.
तालुक्यातील हा भाग दुर्गम असून या भागात विहिरीच्या पाण्याची व बोअरवेलची पातळी खाली गेल्याने या भागात पाणीटंचाई सुरवात झाली आहे. दरवर्षी या भागात पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी पाणीटंचाई कशी दूर होईल, यासाठी योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान या पाणीटंचाईमुळे महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाने याठिकाणी तातडीने टँकर सुरू करावेत जेणेकरून महिलाना पाण्यासाठी फिरावे लागणार नाही.
पाणीटंचाई दूर करण्यासाठी विंधण विहीर मारण्यात येतात. त्याही वेळेत माराव्या, जेणेकरून टंचाई दूर होईल. तथापि, असे होताना दिसत नाही. आराखडा मंजूर होतो केव्हा व बोअरवेल मारतात केव्हा, याची ग्रामस्थ वाट पाहत आहेत. मागील वर्षी मंजूर झालेले बोअरवेल लवकरात लवकर मारण्यात यावेत, जेणेकरून या भागातील टंचाई दूर होऊ शकते, अशी मागणी पंचायत समिती सदस्य यांनी केली आहे. तसेच पाणी लागेल अशाच ठिकाणी बोअरवेल मारण्यात यावे, जेणेकरून हे बोअरवेल पाण्याविना राहणार नाही, अशीही मागणी करण्यात येत आहे.
सर्वेक्षण करावे
दरम्यान या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाणीपुरवठा विभागाने तालुक्यातील कोणकोणत्या पाड्यांना संभाव्य पाणीटंचाई जाणवणार आहे, याचे सर्वेक्षण करण्यात यावे, जेणेकरून टँकरची मागणी करता येईल, अशी अपेक्षा येथील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांनी केली आहे.
नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची माहिती कणकवली : तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे…
पंचांग आज मीती वैशाख शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग आयुष्यमान. चंद्र राशी…
नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल…
श्रीनगर : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारुन ठार केले. या घटनेनंतर…