विक्रमगड तालुक्यातील घोडीचा पाडा येथे पाणीटंचाई

विक्रमगड (वार्ताहर) : विक्रमगड तालुक्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली असून खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील धोडीपाडा येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी विक्रमगड पंचायत समिती पाणीपुरवठा विभागात पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे.


तालुक्यातील हा भाग दुर्गम असून या भागात विहिरीच्या पाण्याची व बोअरवेलची पातळी खाली गेल्याने या भागात पाणीटंचाई सुरवात झाली आहे. दरवर्षी या भागात पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी पाणीटंचाई कशी दूर होईल, यासाठी योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.


दरम्यान या पाणीटंचाईमुळे महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाने याठिकाणी तातडीने टँकर सुरू करावेत जेणेकरून महिलाना पाण्यासाठी फिरावे लागणार नाही.


पाणीटंचाई दूर करण्यासाठी विंधण विहीर मारण्यात येतात. त्याही वेळेत माराव्या, जेणेकरून टंचाई दूर होईल. तथापि, असे होताना दिसत नाही. आराखडा मंजूर होतो केव्हा व बोअरवेल मारतात केव्हा, याची ग्रामस्थ वाट पाहत आहेत. मागील वर्षी मंजूर झालेले बोअरवेल लवकरात लवकर मारण्यात यावेत, जेणेकरून या भागातील टंचाई दूर होऊ शकते, अशी मागणी पंचायत समिती सदस्य यांनी केली आहे. तसेच पाणी लागेल अशाच ठिकाणी बोअरवेल मारण्यात यावे, जेणेकरून हे बोअरवेल पाण्याविना राहणार नाही, अशीही मागणी करण्यात येत आहे.


सर्वेक्षण करावे


दरम्यान या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाणीपुरवठा विभागाने तालुक्यातील कोणकोणत्या पाड्यांना संभाव्य पाणीटंचाई जाणवणार आहे, याचे सर्वेक्षण करण्यात यावे, जेणेकरून टँकरची मागणी करता येईल, अशी अपेक्षा येथील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांनी केली आहे.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार