कारला धडकून बस पलटली; एकाचा जागीच मृत्यू

पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावर रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले. पुण्यातील या अपघाताची भीषण दृश्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. हा अपघात १० तारखेच्या रात्री ११:२५ च्या सुमारास मौजे बजरंगवाडी, शिरूर येथे झाला.


पुणे अहमदनगर महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर एका स्विफ्ट कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती कार महामार्गाच्या मधोमध असलेल्या डिवायडरच्या कठड्यास धडकून ती कार पुण्याहून पुढे अहमदनगरच्या दिशेने चाललेल्या लक्झरी बसला धडकली. या अपघातात त्या कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारने दिलेल्या धक्क्यामुळे बस पलटी होऊन अहमदनगर बाजूकडील रस्त्याच्या उत्तरेस असलेल्या रॉयल पॅलेस हॉटेलच्या मुख्य दरवाज्यात घुसली.


या अपघातात लक्झरी बस मधील चालकासह २२ ते २५ जण जखमी झाले आहेत. यातील ५ जण गंभीर असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ताडोबातल्या तारा वाघीणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत