विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पोलिसांनी दिला समज

  74

मुलुंड (वार्ताहर) : चुकीच्या मार्गाने ड्रायविंग व हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकांविरोधात एक विशेष अभियान दि ५ ते ७ एप्रिल दरम्यान मुलुंड पूर्वेतील रस्त्यावर कांजूरमार्ग वाहतूक विभागातर्फे चालविण्यात आले. यावेळी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांना थांबवून त्यांच्यावर कारवाई केली. हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांना कांजूरमार्ग वाहतूक विभाग येथे बोलावून तेथे त्यांना वाहतूक नियम व्यवस्थित समजावून सांगण्यात आले तसेच मार्गदर्शन करण्यात आले.


वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासंदर्भात विविध व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आले. नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांना यावेळी समजपत्र देण्यात आले व यापुढे पुन्हा नियम मोडल्याचे आढळून आले तर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली.


कांजूरमार्ग वाहतूक विभागाचे प्रभारी पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान मुलुंड पूर्वेतील सर्व चौकात व महत्त्वाच्या रस्त्यावर राबवण्यात आले. यावेळी वाहतूक पोलिसांनी विशेष मेहनत घेत स्वतःच्या सुरक्षिततेसाठी व रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे दुचाकीस्वारांना समजावले.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०

मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की राजकीय नौटंकी!

भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली! मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका