महागाईमुळे लिंबाची चव कडू

Share

नालासोपारा (वार्ताहर) : उन्हाळा येताच लिंबाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते; पण या वर्षी लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या बाजारात २८० ते ३०० रुपये किलोच्या दराने लिंबांची विक्री होत आहे. त्यामुळे एक लिंबू सरासरी २५ रुपयांनी विकले जात आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक वाढ असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

मागील काही दिवसांपासून लिंबाची आवक कमी झाल्याने वसई-विरारमधील लिंबाचा दर तब्बल २८२ रुपये किलोवर पोहोचला आहे. लवकरच हा दर ३०० चा आकडा पार करेल, अशी शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. याआधी लिंबू ५० ते ६० किलो दराने विकले जात होते. यामुळे १० रुपयांना ३ मिळणारी लिंबांचा भाव आता थेट २५ रुपयांना एक इतका वाढला आहे.

घाऊक बाजारातही ५० ते ८० रुपये शेकडा दराने विकले जाणारे लिंबू किलोवर विकले जात असून जेवणात लिंबाची आवश्यकता भासत असल्यामुळे लिंबाला बाजारात चांगली मागणी आहे. लिंबाचे लोणचे दरवर्षी ६० ते ७० रुपये किलो दराने विकले जात होते; पण वाढते दर पाहता मागणीप्रमाणे लोणचे बनवत आहोत, असे एका महिला बचतगटाने सांगितले. दरम्यान, महागाईमुळे उपाहारगृहातून लिंबू गायब झाले आहे. शिवाय लिंबापासून तयार पदार्थांच्या किमतीतसुद्धा वाढ पाहायला मिळत आहे.

लिंबू सरबत १५ रुपये

उन्हाळ्यात उन्हाचा दाह कमी करण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. यात सर्वाधिक लिंबू सरबत विकले जाते; पण आता शीतपेयापेक्षा लिंबू सरबत महागले आहे. जिथे शीतपेयाची छोटी बॉटल १० ते १२ रुपयांना मिळते, तिथे आता लिंबू सरबत १५ रुपयांना मिळत आहे. तथापि, शीतपेयापेक्षा लिंबू सरबत आरोग्यास लाभदायक असल्याने नागरिक खिशाला चिमटा देऊन लिंबू सरबतला पसंती देत आहेत.

Recent Posts

माजी महापौर दत्ता दळवींसह विक्रोळी, कांजूर, भांडूपपासून धारावीपर्यंत हजारो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

आम्ही मुंबई स्वच्छ केली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठावर कडाडून…

31 minutes ago

‘गजवा अल हिंद’शी काँग्रेसचा संबंध काय ?

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश पाकिस्तान विरोधात एकवटला आहे. जो - तो पाकिस्तानची…

40 minutes ago

Prakash Bhende : कलाविश्वात शोककळा! प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते, अभिनेते प्रकाश भेंडे यांनी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून (Marathi) दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश…

2 hours ago

‘पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातलगांना ५० लाखांची मदत देणार’

मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख…

2 hours ago

पॉवरफुल कलाकारांची लवकरच ‘आतली बातमी फुटणार’

मुंबई : प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनासाठी चटपटीत मसालेदार कंटेन्ट हवा असतो. या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी सगळ्याच…

3 hours ago

Jammu Kashmir Tourism : पर्यटकांनो ‘इथे’ फिरण्याचे नियोजन असेल तर आजच रद्द करा!

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये…

3 hours ago