गुजरातचा सलग तिसरा विजय

मुंबई (प्रतिनिधी) : सलामीवीर शुबमन गीलच्या (९६ धावा) आणि कर्णधार हार्दीक पंड्याच्या (२७ धावा) अप्रतिम फलंदाजीवर गुजरात पंजाबविरुद्धचा सामना विजयाच्या उंबरठ्यावर होता. मात्र त्यांच्या अवेळी बाद होण्याने गुजरातचा विजय अशक्यप्राय झाला होता. राहुल तेवतियाने शेवटच्या दोन्ही चेंडूंवर अप्रतिम षटकार ठोकून घशातून हिरावून घेतलेला विजयाचा घास गुजरातला मिळवून दिला. या विजयासह १५ व्या हंगामातील पहिले तिन्ही सामने जिंकणारा गुजरात हा पहिला संघ ठरला आहे.



पंजाबच्या १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या गुजरातचा सलामीवीर मॅथ्यू वेड स्वस्तात परतला. त्यानंतर शुबमन गील आणि साई सुदर्शन या जोडीने गुजरातला विजयाच्या जवळ नेले. शुबमनने पंजाबच्या गोलंदाजांना धु धु धुतले. साई सुदर्शनने ३० चेंडूंत ३५ धावा केल्या. साई सुदर्शनन बाद झाल्यावर हार्दिक पंड्याने शुबमनला चांगली साथ दिली. सामना निर्णायक क्षणी असताना शुबमन बाद झाला. त्याने ५९ चेंडूंत ९६ धावा केल्या. त्यानंतर मात्र धावा करणाऱ्या हार्दीकला दुसऱ्या बाजूने साथच मिळली नाही.


१८ चेंडूंत २७ धावा करत गुजरातच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवणारा कर्णधार हार्दीक धावचीत झाला आणि गुजरातच्या विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले असे वाटत होते. शेवटी २ चेंडूंवर अप्रतिम षटकार ठोकून राहुल तेवतीयाने अशक्यप्राय वाटणारे असे विजयी लक्ष्य संघाला गाठून दिले. तत्पूर्वी पंजाबची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या ११ असताना कर्णधार मयांक अगरवालच्या रुपाने पंजाबला पहिला धक्का बसला.


त्यानंतर जॉनी बेअरस्टोलाही फार काळ मैदानात टिकता आले नाही. अवघ्या ३४ धावांवर त्यांचे २ फलंदाज माघारी परतले होते. शिखर धवन आणि लिअम लिव्हींगस्टोन या जोडीने पंजाबला सावरण्याचा प्रयत्न केला. धवनने (३० चेंडूंत ३५ धावांची) संयमी खेळी केली. लिअम लिव्हींगस्टोन पंजाबसाठी देवासारखा धाऊन आला. त्याने ७ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर २७ चेंडूंत ६४ धावांची मोठी खेळी केली.

Comments
Add Comment

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिका, भारत-आफ्रिका आमनेसामने; दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत