राष्ट्रवादी भाजपबरोबर कधीच नव्हती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत कधीच नव्हती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिले.


दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेना सध्या भाजपविरोधात उभी आहे, असे सांगत त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकारचे चांगले सुरू असल्याची ग्वाही देखील शरद पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.


लक्षद्वीपच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असल्याचे दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये झालेल्या भेटीमुळे राज्यासहित दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यांच्यामध्ये पंतप्रधान कार्यालयात जवळपास २० मिनिटे चर्चा सुरू होती. दरम्यान या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण या चर्चेचा तपशील काय होता? याची माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.


पवार म्हणाले, लक्षद्वीपच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रातील कारवायांसदर्भात पंतप्रधान मोदींशी कुठलीही चर्चा झाली नाही. संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा मुद्दा यावेळी मांडला. विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या प्रलंबित नियुक्त्यांवर या बैठकीत चर्चा झाली. त्यांच्यावर कारवाईची गरजच काय होती? असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला.


दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांच्यावरील कारवाईसंबंधी यावेळी कुठलीही चर्चा झाली नसल्याचेही यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

सुप्रीम कोर्टाची अरावली प्रकरणात स्वतःच्या निर्णयालाच स्थगिती

नवी दिल्ली : अरावली खटल्याची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात पर्वतरांगांच्या नवीन व्याख्येवर

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह

टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसला भीषण आग, २० हून अधिक प्रवासी जखमी, १ मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला.

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.