मान्सूनपूर्व वृक्ष छाटणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्यात झाडे कोसळू नये व फांद्या पडून अपघात होऊ नये यासाठी महापालिका वृक्ष छाटणी करत असते. दरम्यान मुंबई महानगरपालिकेकडून मान्सून पूर्व वृक्षछाटणीस सुरुवात झाली आहे. मात्र यंदा या वृक्ष छाटणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 'मॅक लिफ्टन'मुळे झाडाच्या उंचीपर्यंत पोचणे शक्य होत असून झाडांची गरजेनुसार छाटणी होण्यास मदत मिळत आहे. यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक ते तांत्रिक प्रशिक्षण पालिकेकडून दिले जात आहे.


मुंबईत पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटना घडतात. त्यावर उपाय म्हणून उद्यान विभागातर्फे उंच वृक्षांवरील मृत व धोकादायक फांद्या छाटणीचे काम केले जाते. याआधी हे काम मनुष्यबळाने केले जात होते, मात्र आता मात्र फांद्या छाटणीसाठी 'मॅक लिफ्टन' हे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. या तंत्रज्ञानामुळे फांद्यांच्या उंचीपर्यंत पोचण्यास आणि नेमकी छाटणी करण्यास मदत मिळत आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.


दरम्यान मुंबईत ३० लाखांहून अधिक झाडे आहेत. त्यातील १ लाख ९४ हजार झाडे महापालिकेच्या रस्त्यावर आहेत तर झाडांबाबतचा सर्व्हे हा १५ मे पर्यंत पूर्ण होणार असून छाटणीचे कामही पूर्ण होईल असेही परदेशी यांनी सांगितले. आतापर्यंत २१ हजार ७५५ झाडांची छाटणी केल्याची माहिती परदेशी यांनी दिली.


दरम्यान सोसायट्यांच्या आतील झाडांची छाटणीही केली जात आहे. त्यासाठी पालिकेने आतापर्यंत ५ हजार २६२ नोटीसा जारी केल्या आहेत. आपल्या परिसरातील मृत व धोकादायक वृक्ष/ फांद्या आढळल्यास विभाग स्तरावर उद्यान विभागाशी संपर्क करून रीतसर परवानगी घेऊन मृत व धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात यावी असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती