मान्सूनपूर्व वृक्ष छाटणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्यात झाडे कोसळू नये व फांद्या पडून अपघात होऊ नये यासाठी महापालिका वृक्ष छाटणी करत असते. दरम्यान मुंबई महानगरपालिकेकडून मान्सून पूर्व वृक्षछाटणीस सुरुवात झाली आहे. मात्र यंदा या वृक्ष छाटणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 'मॅक लिफ्टन'मुळे झाडाच्या उंचीपर्यंत पोचणे शक्य होत असून झाडांची गरजेनुसार छाटणी होण्यास मदत मिळत आहे. यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक ते तांत्रिक प्रशिक्षण पालिकेकडून दिले जात आहे.


मुंबईत पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटना घडतात. त्यावर उपाय म्हणून उद्यान विभागातर्फे उंच वृक्षांवरील मृत व धोकादायक फांद्या छाटणीचे काम केले जाते. याआधी हे काम मनुष्यबळाने केले जात होते, मात्र आता मात्र फांद्या छाटणीसाठी 'मॅक लिफ्टन' हे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. या तंत्रज्ञानामुळे फांद्यांच्या उंचीपर्यंत पोचण्यास आणि नेमकी छाटणी करण्यास मदत मिळत आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.


दरम्यान मुंबईत ३० लाखांहून अधिक झाडे आहेत. त्यातील १ लाख ९४ हजार झाडे महापालिकेच्या रस्त्यावर आहेत तर झाडांबाबतचा सर्व्हे हा १५ मे पर्यंत पूर्ण होणार असून छाटणीचे कामही पूर्ण होईल असेही परदेशी यांनी सांगितले. आतापर्यंत २१ हजार ७५५ झाडांची छाटणी केल्याची माहिती परदेशी यांनी दिली.


दरम्यान सोसायट्यांच्या आतील झाडांची छाटणीही केली जात आहे. त्यासाठी पालिकेने आतापर्यंत ५ हजार २६२ नोटीसा जारी केल्या आहेत. आपल्या परिसरातील मृत व धोकादायक वृक्ष/ फांद्या आढळल्यास विभाग स्तरावर उद्यान विभागाशी संपर्क करून रीतसर परवानगी घेऊन मृत व धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात यावी असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा