स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी सरकारमधून सोडचिठ्ठी

कोल्हापूर : गेली दोन वर्षे राज्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत टीकेची झोड उठवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अखेर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी अधिकृत घोषणा केली.


शेतकऱ्यांना महापुरातील नुकसान भरपाई, दिवसा वीज, कर्जमाफी, प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान अशा विविध मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या होत्या. या सर्व मागण्याबाबत फारशी सकारात्मक भूमिका सरकारने घेतला नसल्यानेच आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा शेट्टी यांनी केली.


शेट्टी यांच्या या घोषणेने महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. अडीच वर्षात प्रथमच आघाडीतून एक पक्ष बाहेर पडला आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन्ही काँग्रेसबरोबर आघाडी केली. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होताना संघटना या आघाडीत सहभागी झाली होती.

Comments
Add Comment

२० तलवारींसह मुस्लिम तरुणाला अटक, कोणता कट शिजत होता?

जळगाव : दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाया केल्या

पुणेकरांची iPhone १७ खरेदीसाठी तुफान गर्दी !

पुणे : पुण्यात ॲपलने अधिकृत स्टोअर सुरू केले आहे. कोपा मॉलमध्ये सुरू झालेल्या या स्टोअरला पुणेकरांनी चांगलाच

मेगाभरती ! पुण्यात मेट्रो-३ च्या सर्व गाड्या महिला पायलट चालवणार

पुणे : पुण्यात मेट्रोचे काम अगदी जोमात सुरु आहे. येत्या काही महिन्यात आयटी हब असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर

काका शरद पवारांपासून वेगळं का झालो? अजितदादांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

नागपूर: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या

Nagpur Flyover: चक्क घराच्या बाल्कनीतून गेला उड्डाणपूल, घरमालकालाही काहीच हरकत नाही!

नागपूर: नागपूरमधील एका बांधकामाधीन उड्डाणपुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पूलाचा रोटरी

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली मुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला