स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी सरकारमधून सोडचिठ्ठी

कोल्हापूर : गेली दोन वर्षे राज्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत टीकेची झोड उठवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अखेर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी अधिकृत घोषणा केली.


शेतकऱ्यांना महापुरातील नुकसान भरपाई, दिवसा वीज, कर्जमाफी, प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान अशा विविध मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या होत्या. या सर्व मागण्याबाबत फारशी सकारात्मक भूमिका सरकारने घेतला नसल्यानेच आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा शेट्टी यांनी केली.


शेट्टी यांच्या या घोषणेने महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. अडीच वर्षात प्रथमच आघाडीतून एक पक्ष बाहेर पडला आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन्ही काँग्रेसबरोबर आघाडी केली. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होताना संघटना या आघाडीत सहभागी झाली होती.

Comments
Add Comment

पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्या ठार ; वनविभागाची कारवाई

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या

वर्धा शहरातील रामनगर येथील भूखंड मालकी हक्काने देण्यास मंजुरी

मुंबई : वर्धा नगरपरिषदेच्या मालकीचे रामनगरमधील भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने करून

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम कार्यक्रमासाठी ९५.३५ कोटींची तरतूद

मुंबई : शिख धर्माचे नववे गुरू आणि ‘हिंद-की-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी

मच्छिमारांना कर्जावर चार टक्के व्याज सवलत

मुंबई : राज्यातील मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादकांसह किसान क्रेडिट कार्डधारक मत्स्यव्यावसायिकांना २

सोलापूरच्या असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांचा मार्ग मोकळा

मुंबई : सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर)

नागपूरच्या लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठास सात कोटी रुपयांचा निधी

मुंबई : नागपूर येथील लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेस जीव रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र