नालेसफाईच्या कामांना तातडीने मंजुरी द्या

मुंबई (प्रतिनिधी) : नालेसफाईच्या कामाबाबत भाजप आक्रमक झाली असून भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पालिकेच्या प्रशासकांची भेट घेतली. दरम्यान मार्च महिन्यात सुरू होणारी नालेसफाई अद्यापही झालेली नाही तर यावेळी कंत्राटच मंजूर झालेले नसल्याने १५ एप्रिल नंतरच नालेसफाई सुरू होणार आहे. यामुळे सुमारे ३७५ कि. मी.चे नाले अवघ्या दिड महिन्यात कसे साफ होणार? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. तर तातडीने नालेसफाईच्या कामांना मंजुरी द्या अशी मागणी शेलार यांनी पालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.


दरवर्षी मुंबईत नालेसफाईला मार्च महिन्यात सुरुवात होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने निविदा काढून ७ मार्चला स्थायी समितीत १६० कोटींचा प्रस्ताव मंजूरीसाठी आणला होता. पण सत्ताधाऱ्यांनी तो राखून ठेवला. त्यानंतर पालिकेची मुदत संपली प्रशासक नियुक्ती झाले. एवढ्या उशिरा सुरुवात करून कामे कशी पूर्ण होणार, जर कामे वेळेत पूर्ण झाली नाही तर मुंबईकरांना यावेळी पावसाळ्यात भयाण परिस्थितीला सामोरे जावे लागेल, अशी भीती आशिष शेलार यांनी व्यक्त केली.


सत्ताधारी पक्षाने पळ काढला तरी आम्ही या विषयाचा पाठपुरावा करणार, वेळेत कामे पूर्ण व्हावीत, भ्रष्टाचार होणार नाही, पूर्ण गाळ काढला जाईल यासाठी आम्ही मुंबईकरांच्या वतीने या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार असल्याचेही शेलार यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग

मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर

मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून,

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या