आसाम- मेघालयमधील सीमावाद संपुष्टात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाम आणि मेघालय या ईशान्येकडील दोन राज्यांत गेल्या ५० वर्षांपासून सीमावाद कायमचा संपुष्टात आला आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांमध्ये मंगळवारी ऐतिहासिक करार करण्यात आला आहे.


आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांची या कराराला सहमती झाली असून याद्वारे एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. विवादमुक्त ईशान्य भारत हे आमचे लक्ष्य असून त्यासाठी मंगळवारचा दिवस ऐतिहासिक असल्याची भावना यावेळी अमित शहा यांनी व्यक्त केली.


आसामनचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि कॉनराड संगमा यांनी आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली व सीमावाद निकाली काढण्यासाठी करार करण्यात आला. या करारावर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून अमित शहा यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. या कराराबाबत शहा यांनीच अधिक माहिती दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ईशान्य भारत विवादमुक्त बनवून तिथे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सातत्याने केले आहेत. त्यादृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. ईशान्येकडील राज्यांत शांततेसोबतच विकास, समृद्धी आणि सांस्कृतिक वारसा यास अग्रक्रम दिला जाणार असून त्या प्रयत्नांना आज मोठे यश मिळाले आहे, असे शहा म्हणाले. आसाम आणि मेघालय या राज्यांत गेल्या ५० वर्षांपासून सीमावाद धुमसत आहे. हा वाद आता कायमचा मिटेल असा मला विश्वास आहे. एकूण सीमेचा विचार केल्यास ७० टक्के सीमा आज वादमुक्त झाली आहे. वादाचे एकूण १२ मुद्दे आहेत. त्यातील ६ मुद्द्यांवर मंगळवारी तोडगा काढण्यात आला आहे. उरलेल्या सहा मुद्द्यांबाबत चर्चेतून तोडगा काढला जाईल. नजीकच्या भविष्यात वादाचे सर्व मुद्दे निश्चितपणे निकाली निघतील, असेही शहा म्हणाले.


ऐतिहासिक करारानंतर संगमा आणि हेमंत बिस्वा सरमा यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ज्या मुद्द्यांवर वाद आहे त्यावर आम्ही आपसात चर्चा करून मार्ग काढू, असे संगमा म्हणाले तर पुढच्या टप्प्यातील चर्चा लवकरच सुरू केली जाईल. येत्या सहा-सात महिन्यांत वादाचे उर्वरित सहा मुद्दे निकाली काढले जातील, असे सरमा यांनी सांगितले.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व