आसाम- मेघालयमधील सीमावाद संपुष्टात

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाम आणि मेघालय या ईशान्येकडील दोन राज्यांत गेल्या ५० वर्षांपासून सीमावाद कायमचा संपुष्टात आला आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांमध्ये मंगळवारी ऐतिहासिक करार करण्यात आला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांची या कराराला सहमती झाली असून याद्वारे एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. विवादमुक्त ईशान्य भारत हे आमचे लक्ष्य असून त्यासाठी मंगळवारचा दिवस ऐतिहासिक असल्याची भावना यावेळी अमित शहा यांनी व्यक्त केली.

आसामनचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि कॉनराड संगमा यांनी आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली व सीमावाद निकाली काढण्यासाठी करार करण्यात आला. या करारावर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून अमित शहा यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. या कराराबाबत शहा यांनीच अधिक माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ईशान्य भारत विवादमुक्त बनवून तिथे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सातत्याने केले आहेत. त्यादृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. ईशान्येकडील राज्यांत शांततेसोबतच विकास, समृद्धी आणि सांस्कृतिक वारसा यास अग्रक्रम दिला जाणार असून त्या प्रयत्नांना आज मोठे यश मिळाले आहे, असे शहा म्हणाले. आसाम आणि मेघालय या राज्यांत गेल्या ५० वर्षांपासून सीमावाद धुमसत आहे. हा वाद आता कायमचा मिटेल असा मला विश्वास आहे. एकूण सीमेचा विचार केल्यास ७० टक्के सीमा आज वादमुक्त झाली आहे. वादाचे एकूण १२ मुद्दे आहेत. त्यातील ६ मुद्द्यांवर मंगळवारी तोडगा काढण्यात आला आहे. उरलेल्या सहा मुद्द्यांबाबत चर्चेतून तोडगा काढला जाईल. नजीकच्या भविष्यात वादाचे सर्व मुद्दे निश्चितपणे निकाली निघतील, असेही शहा म्हणाले.

ऐतिहासिक करारानंतर संगमा आणि हेमंत बिस्वा सरमा यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ज्या मुद्द्यांवर वाद आहे त्यावर आम्ही आपसात चर्चा करून मार्ग काढू, असे संगमा म्हणाले तर पुढच्या टप्प्यातील चर्चा लवकरच सुरू केली जाईल. येत्या सहा-सात महिन्यांत वादाचे उर्वरित सहा मुद्दे निकाली काढले जातील, असे सरमा यांनी सांगितले.

Recent Posts

Prakash Bhende : कलाविश्वात शोककळा! प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते, अभिनेते प्रकाश भेंडे यांनी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून (Marathi) दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश…

53 minutes ago

‘पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातलगांना ५० लाखांची मदत देणार’

मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख…

1 hour ago

पॉवरफुल कलाकारांची लवकरच ‘आतली बातमी फुटणार’

मुंबई : प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनासाठी चटपटीत मसालेदार कंटेन्ट हवा असतो. या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी सगळ्याच…

1 hour ago

Jammu Kashmir Tourism : पर्यटकांनो ‘इथे’ फिरण्याचे नियोजन असेल तर आजच रद्द करा!

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये…

2 hours ago

पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला करणारा पाकिस्तानच्या लष्करात होता SSG कमांडो

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन…

2 hours ago

Blouse Bow-Note Designs : ब्लाऊजसाठी ‘या’ बॅक बो-नॉट डिझाइन्स नक्की ट्राय करा!

महिलांना किंवा मुलींना ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न शिवण्याची खूप आवड असते. कोणत्याही समारंभात साडी नवीन…

2 hours ago