आसाम- मेघालयमधील सीमावाद संपुष्टात

  69

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाम आणि मेघालय या ईशान्येकडील दोन राज्यांत गेल्या ५० वर्षांपासून सीमावाद कायमचा संपुष्टात आला आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांमध्ये मंगळवारी ऐतिहासिक करार करण्यात आला आहे.


आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांची या कराराला सहमती झाली असून याद्वारे एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. विवादमुक्त ईशान्य भारत हे आमचे लक्ष्य असून त्यासाठी मंगळवारचा दिवस ऐतिहासिक असल्याची भावना यावेळी अमित शहा यांनी व्यक्त केली.


आसामनचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि कॉनराड संगमा यांनी आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली व सीमावाद निकाली काढण्यासाठी करार करण्यात आला. या करारावर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून अमित शहा यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. या कराराबाबत शहा यांनीच अधिक माहिती दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ईशान्य भारत विवादमुक्त बनवून तिथे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सातत्याने केले आहेत. त्यादृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. ईशान्येकडील राज्यांत शांततेसोबतच विकास, समृद्धी आणि सांस्कृतिक वारसा यास अग्रक्रम दिला जाणार असून त्या प्रयत्नांना आज मोठे यश मिळाले आहे, असे शहा म्हणाले. आसाम आणि मेघालय या राज्यांत गेल्या ५० वर्षांपासून सीमावाद धुमसत आहे. हा वाद आता कायमचा मिटेल असा मला विश्वास आहे. एकूण सीमेचा विचार केल्यास ७० टक्के सीमा आज वादमुक्त झाली आहे. वादाचे एकूण १२ मुद्दे आहेत. त्यातील ६ मुद्द्यांवर मंगळवारी तोडगा काढण्यात आला आहे. उरलेल्या सहा मुद्द्यांबाबत चर्चेतून तोडगा काढला जाईल. नजीकच्या भविष्यात वादाचे सर्व मुद्दे निश्चितपणे निकाली निघतील, असेही शहा म्हणाले.


ऐतिहासिक करारानंतर संगमा आणि हेमंत बिस्वा सरमा यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ज्या मुद्द्यांवर वाद आहे त्यावर आम्ही आपसात चर्चा करून मार्ग काढू, असे संगमा म्हणाले तर पुढच्या टप्प्यातील चर्चा लवकरच सुरू केली जाईल. येत्या सहा-सात महिन्यांत वादाचे उर्वरित सहा मुद्दे निकाली काढले जातील, असे सरमा यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Terrorist hideout destroyed: पुंछमध्ये दहशतवादी अड्डा नष्ट, शस्त्रसामुग्री जप्त

सुरनकोट जंगलात लष्कर-पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शस्त्रसाठा सापडला; किश्तवाडमध्ये स्वतंत्र दहशतवादविरोधी

Bihar polls: सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो; 'हा महिलांचा अपमान' महिलांची टीका

पाटणा : बिहार काँग्रेसने "प्रियदर्शिनी उड्डाण योजना" अंतर्गत पाच लाख सॅनिटरी पॅड बॉक्स वाटप करण्याची घोषणा केली

शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू

बाराबंकी : शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशमधील

PM Modi Award List : ११ वर्षांत २५ पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींचा सन्मान; पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाना या देशाने त्यांचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. मोदी

अमरनाथ यात्रा मार्गावर भीषण अपघात: ५ बस एकमेकांवर आदळल्या, ३६ यात्रेकरू जखमी!

जम्मू: अमरनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांवर आज दुर्दैवी प्रसंग ओढवला. जम्मू आणि काश्मीरमधील रामबन

Grand Chess Tour 2025 : गुकेशची कमाल! कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं अन् गुकेशनं त्याच्याचं नाकावर टिच्चून 'रॅपिड' स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं

नवी दिल्ली : क्रोएशियातील झाग्रेब येथे झालेल्या ग्रँड चेस टूर २०२५ रॅपिड अँड ब्लिट्झमध्ये विद्यमान विश्वविजेता