आसाम- मेघालयमधील सीमावाद संपुष्टात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाम आणि मेघालय या ईशान्येकडील दोन राज्यांत गेल्या ५० वर्षांपासून सीमावाद कायमचा संपुष्टात आला आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांमध्ये मंगळवारी ऐतिहासिक करार करण्यात आला आहे.


आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांची या कराराला सहमती झाली असून याद्वारे एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. विवादमुक्त ईशान्य भारत हे आमचे लक्ष्य असून त्यासाठी मंगळवारचा दिवस ऐतिहासिक असल्याची भावना यावेळी अमित शहा यांनी व्यक्त केली.


आसामनचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि कॉनराड संगमा यांनी आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली व सीमावाद निकाली काढण्यासाठी करार करण्यात आला. या करारावर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून अमित शहा यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. या कराराबाबत शहा यांनीच अधिक माहिती दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ईशान्य भारत विवादमुक्त बनवून तिथे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सातत्याने केले आहेत. त्यादृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. ईशान्येकडील राज्यांत शांततेसोबतच विकास, समृद्धी आणि सांस्कृतिक वारसा यास अग्रक्रम दिला जाणार असून त्या प्रयत्नांना आज मोठे यश मिळाले आहे, असे शहा म्हणाले. आसाम आणि मेघालय या राज्यांत गेल्या ५० वर्षांपासून सीमावाद धुमसत आहे. हा वाद आता कायमचा मिटेल असा मला विश्वास आहे. एकूण सीमेचा विचार केल्यास ७० टक्के सीमा आज वादमुक्त झाली आहे. वादाचे एकूण १२ मुद्दे आहेत. त्यातील ६ मुद्द्यांवर मंगळवारी तोडगा काढण्यात आला आहे. उरलेल्या सहा मुद्द्यांबाबत चर्चेतून तोडगा काढला जाईल. नजीकच्या भविष्यात वादाचे सर्व मुद्दे निश्चितपणे निकाली निघतील, असेही शहा म्हणाले.


ऐतिहासिक करारानंतर संगमा आणि हेमंत बिस्वा सरमा यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ज्या मुद्द्यांवर वाद आहे त्यावर आम्ही आपसात चर्चा करून मार्ग काढू, असे संगमा म्हणाले तर पुढच्या टप्प्यातील चर्चा लवकरच सुरू केली जाईल. येत्या सहा-सात महिन्यांत वादाचे उर्वरित सहा मुद्दे निकाली काढले जातील, असे सरमा यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Iran Israel War : युद्धाच्या सावटाखालील मराठी नागरिकांसाठी मुख्यमंत्री मदतीला धावले; विशेष व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन जारी

परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास अलर्ट मोडवर मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर,

S-400 Air Defence Systems : भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार! रशियाकडून आणखी ५ 'S-४००' आणि 'पँटसिर' क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीला मंजुरी

नवी दिल्ली : मध्य-पूर्व आशियात सध्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 'कामिकाझे' (Kamikaze) ड्रोनचा वापर करून युद्ध पेटलेले

Gujrat Viral Video : काळ आला होता पण वेळ...गुजरातच्या वलसाडमधील लिफ्टचा भीषण अपघात; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

वलसाड : गुजरातच्या वलसाड येथील 'सरदार हाईट्स' या गुजरात हाऊसिंग बोर्ड संकुलात आज सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी एक

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने दिली अधिकृत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : इराण आणि आखाती प्रदेशात २८ फेब्रुवारी २०२६ पासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू झाल्याचे समजताच

मध्य पूर्वेतल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेसंदर्भात पूर्णपणे सज्ज

विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 24×7 नियंत्रण कक्ष नवी

पुँछमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

नवी दिल्ली : भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य