मुंबई : मागील तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अनेक प्रयत्न करूनही आंदोलनावर सरकारला तोडगा काढता आलेला नाही. हे सरकारचे अपयश असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी विधानसभेत मान्य केले आहे. सोबतच संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही. ३१ तारखेपर्यंत सर्व कामगारांनी कामावर यावे, असे आवाहनही अनिल परब यांनी केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू आहे. सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतरही आंदोलन संपलेले नाही. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीवर आंदोलक ठाम आहेत. ही मागणी मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
यामुळे दिवसेंदिवस आंदोलन चिघळत गेले. शुक्रवारी विधान परिषदेत अनिल परब यांनी संपाबाबत निवेदन जाहीर केले आहे. निवेदनात संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही. ३१ तारखेपर्यंत सर्व कामगारांनी कामावर यावे’ असे म्हटले आहे. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने सरकारने अनेक प्रयत्न केल्यानंतरही संप सुरूच आहे.
बंगळुरू : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४४ सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्व संघांनी केलेल्या…
पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) जम्मू…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे कन्नड तालुक्यात एका लग्न समारंभातील जेवणातून तब्बल…
अंत्यसंस्काराला अडीच लाख लोकांची उपस्थिती नवी दिल्ली : ख्रिश्चन कॅथोलिक धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे…
जम्मू आणि काश्मीर: पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेली भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलण्यास…
मंत्री नितेश राणे यांनी दिला दापोलीवासीयांना विश्वास दापोली : आज आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे…