हैदराबादेत भीषण अग्नितांडव, झोपेतच ११ जणांचा मृत्यू


हैदराबाद : तेलंगणातील हैदराबादमध्ये बुधवारी आगीची मोठी घटना समोर आली आहे. हैदराबादमधील भोईगुडा येथे एका भंगार दुकानाला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. या आगीत एक जण गंभीर जखमी झाला आहे.


हैदराबादेतील भोईगुडा परिसरातील भंगार दुकानाला बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये झोपेत असलेल्या ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर एकाला स्वतःचा जीव वाचविण्यात यश आलं. पण तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व कामगार बिहार येथील असल्याची माहिती मिळतेय. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपास सुरू असल्याचे गांधी नगरचे पोलिस अधिकारी मोहन राव यांनी सांगितले.


आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सध्या याप्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरच तपशील सादर केला जाईल, असं हैदराबादचे जिल्हाधिकारी एल. शर्मन यांनी सांगितले.


तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सिकंदराबादमधील भोईगुडा भंगार दुकानाला लागलेल्या आगीत बिहारमधील कामगारांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आणि मुख्य सचिवांना या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचे मृतदेह बिहारला पाठविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे