नवी दिल्ली : फेम – इंडीया योजनेअंतर्गत, इलेक्ट्रिक वाहनांच्या ग्राहकांना खरेदी किमतीत घट करून प्रोत्साहन दिले जाते. हे प्रोत्साहन बॅटरी क्षमतेशी जोडलेले आहे, म्हणजे e-3W आणि e-4W साठी रुपये 10,000/KWh वाहनाच्या किंमतीच्या 20% मर्यादेसह. त्यानंतर, 11 जून 2021 पासून e-2W साठी प्रोत्साहन/अनुदान रु. 10,000/KWh वरून वाढ करत 15,000रुपये/KWh पर्यंत वाढ करण्यात आली.त्याच बरोबर प्रोत्साहनाच्या कमाल मर्यादेतही वाहन किमतीच्या 20% वरून 40% पर्यंत वाढ करण्यात आली.
महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर जीएसटी दर 5% आहे. जीएसटी दर जीएसटी परिषदेच्या शिफारशींवर आधारित आहेत. इलेक्ट्रिक वाहने आधीच 5% च्या सर्वात कमी दराच्या स्तरावर आहेत.
देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यासाठी सरकारने पुढील पावले उचलली आहेत:
देशात बॅटरीच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने 12 मे 2021 रोजी एडव्हान्स केमिस्ट्री सेलच्या (एसीसी) उत्पादनासाठी, उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला मान्यता दिली. बॅटरीच्या किमतीत घट झाल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होईल.
वाहन उद्योग आणि वाहन भागांसाठी 15 सप्टेंबर 2021 रोजी मंजूर झालेल्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेअंतर्गत 25,938 कोटी रुपये खर्चासह पाच वर्षांच्या कालावधीसाठी इलेक्ट्रिक वाहने समाविष्ट करण्यात आली आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी 12% वरून 5% केला आहे; इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जर/चार्जिंग स्टेशनवरील जीएसटी 18% वरून 5% केला आहे.
बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना हिरव्या रंगाची परवाना फलकपट्टी दिली जाईल आणि त्यांना परवाना आवश्यकतांमधून सूट दिली जाईल अशी घोषणा, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) केली आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून राज्यांना इलेक्ट्रिक वाहनांवरील पथकर माफ करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे इलेक्ट्रीक वाहनांचा प्रारंभिक खर्च कमी होण्यास मदत होईल.
अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…