मुंबईसह राज्यात उष्णतेची तीव्र लाट

मुंबई : राज्यात वारंवार हवामानात बदल होत असताना आता उन्हाच्या झळा सोसण्यासाठी तयार राहा, येत्या २ दिवसांमध्ये राज्यात उष्णतेची लाट येणार असून मुंबईमध्ये कमाल तापमान घसरण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत उष्णतेची लाट येणार असून नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. येत्या २ दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान ३९°सेल्शिअस राहिल आणि नंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंबंधी आयएमडीकडूनही माहिती देण्यात आली आहे.


'कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष : कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा ४.५°C वर व कमाल तापमान किमान ३७°C असेल.' असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.


हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी देखील यासंबंधी एक ट्विट करत मुंबईत उष्णता वाढणार असल्याची माहिती दिली आहे.


गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार आपण हवामानात होणारे बदल आणि सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात आता उष्णाचा तडाखा वाढणार आहे.


हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह, राज्यातील पुणे, कोकण, मराठवाडा-विदर्भातही उष्ण तापमान असेल. या वातावरणामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शरीराच्या पाणी पातळीत वाढ करावी, भरपूर पाणी प्यावे आणि काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

पुण्याच्या NDA मध्ये गूढ! एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू: नेमकं चाललंय तरी काय?

पुणे : पुण्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत

मुंबई पोलिसांचा दाऊदच्या टोळीला मोठा झटका! ड्रग्सचा कारखाना सांगलीत तर मास्टरमाइंड दुबईतून पकडला

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (गुन्हे शाखेने) एक मोठे ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय जाळे पकडून दाऊद